Posts

ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨
Image
माणगाव तालुका प्रेस क्लबतर्फे 'आदर्श शेतकरी पुरस्कार' सोहळा संपन्न गांगवली-मोकाशीवाडी येथे भूमिपुत्रांच्या कर्तृत्वाचा विशेष बहुमान  कृषीनिष्ठेचा सन्मान  माणगाव-रायगड, दि. ७ (उत्तम तांबे) :- ​रायगड जिल्हा प्रेस क्लबशी संलग्न असलेल्या माणगाव तालुका प्रेस क्लब या सेवाभावी पत्रकार संघटनेच्या वतीने बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी माणगाव तालुक्यातील गांगवली-मोकाशीवाडी येथे 'आदर्श शेतकरी पुरस्कार' वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. गांगवली आणि मोकाशीवाडी पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी दांपत्य श्री. विजय विष्णू दाखीणकर व सौ. वैभवी विजय दाखीणकर, तसेच श्री. रामदास महिपत धाडवे व सौ. शैला रामदास धाडवे या शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी योगदानाचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या दोन्ही प्रगतशील शेतकरी दांपत्त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन 'आदर्श शेतकरी पुरस्कारा'ने अत्यंत सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. ​शेतकऱ्यांनी दाखवलेली शेतीनिष्ठा, त्यांची नाविन्यपूर्ण उपक्रमशीलता ...
Image
प्रदीर्घ अनुभवानंतरही अनेक ज्येष्ठ पत्रकार अधिस्वीकृती ओळखपत्रापासून वंचित! ज्येष्ठ पत्रकारांची व्यथा आणि शासनाची नियमावली  जाणून घ्या प्रक्रिया, कोटा आणि कायदे  मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) :- दशकानुशतके क्षेत्रात राबणाऱ्या अनेक ज्येष्ठ पत्रकारांची एक मुख्य व्यथा समोर येत असते, ती म्हणजे— वर्षानुवर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारितेनंतरही त्यांना शासनाची अधिकृत 'अधिस्वीकृती पत्रिका' (Press Accreditation Card) मिळालेली नसते. परंतु यामागील मुख्य कारण पत्रकाराचा अनुभव नसून, ते ज्या वृत्तपत्र, टीव्ही चॅनेल किंवा न्यूज पोर्टलमध्ये काम करतात तिथल्या संपादकांना सर्वांना हे कार्ड देण्याची मर्यादा असणे हे आहे. शासनाने वृत्तपत्राचा खप आणि मीडियाच्या प्रकारानुसार अधिस्वीकृतीचा एक विशिष्ट 'कोटा' ठरवून दिला आहे, ज्यामुळे अनेक पात्र व ज्येष्ठ पत्रकारांना या ओळखपत्रापासून वंचित राहावे लागते. यासंदर्भात पत्रकारांमध्ये जनजागृती व्हावी आणि अधिस्वीकृती पत्रिकेचे नियम, फायदे व अर्ज प्रक्रिया सर्वांना स्पष्ट व्हावी, यासाठीचा हा सविस्तर आढावा. ​महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्...
Image
ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज - कामगार नेते दिपकभाई रानवडे ​बेणसे-रायगड, दि. ६ (चंद्रकांत अडसुळे) :- वाढत्या जागतिक तापमानाला (ग्लोबल वॉर्मिंग) आळा घालण्यासाठी झाडे अत्यंत उपयुक्त ठरतात. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि मानवी अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्षलागवड ही आजच्या काळाची सर्वात महत्त्वाची गरज बनली आहे. वाढते प्रदूषण, ऑक्सिजनची कमतरता आणि ऋतूचक्रात होणारे बदल रोखण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे जतन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते श्री. दिपकभाई रानवडे यांनी केले. भारतीय श्रमिक शक्ती संघ (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे युनिट) आणि भारतीय कामगार सेना (रिलायन्स नागोठणे युनिट) यांच्या संयुक्त विद्यमाने कडसुरे येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, हे केवळ वृक्षारोपण नसून एक सामाजिक कर्तव्य आहे. फक्त झाडे लावणे पुरेसे नसून, लावलेले प्रत्येक रोप मोठे होईपर्यंत त्याचे संगोपन करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. ​या का...
Image
जुने शालेय अभिलेख डिजिटल करण्याबाबत आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांना निवेदन जात पडताळणी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्याची मागणी ​ मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) :- राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग (OBC) तसेच विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जुन्या शालेय नोंदींचे डिजिटल जतन करण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने इतर मागासवर्ग कल्याण समितीचे प्रमुख व आमदार श्री. सुरेश भोळे (राजुमामा) यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ​जात प्रमाणपत्र आणि वैधता मिळवण्यासाठी नियमानुसार विविध प्रवर्गांसाठी विशिष्ट वर्षांपूर्वीचे पुरावे सादर करणे अनिवार्य असते. यामध्ये अनुसूचित जमातीसाठी १३ जून १९५०, अनुसूचित जातीसाठी १० ऑगस्ट १९५०, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी २१ नोव्हेंबर १९६१, तर इतर मागासवर्ग (OBC) आणि विशेष मागास प्रवर्गासाठी १३ ऑक्टोबर १९६७ किंवा त्यापूर्वीच्या शालेय नोंदी आणि अभिलेख हे अत्यंत महत्त्वाचे पुरावे मानले जातात. मात्र, आजच्या घडीला ह...
Image
​ कोलाडच्या दक्ष पत्रकारांची सामाजिक बांधीलकी ठरली दिशादर्शक! खड्ड्यांच्या समस्येवर प्रमोदशेठ म्हसकर प्रतिष्ठान धावले मदतीला आंबेवाडी नाक्यावरील खड्डे बुजवून मार्ग मोकळा  पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश!  रायगड, दि. ६ (भिवा पवार) :- मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुलाखालील आणि सर्व्हिस रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांविषयी स्थानिक पत्रकारांनी पोलीस प्रशासनाकडे दाद मागून आवाज उठवला होता. रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष डॉ. श्याम लोखंडे यांच्यासह पत्रकार भिवा पवार, विश्वास निकम, अजय परदेसी, तेजपाल जैन आणि नंदकुमार कळमकर या कोलाड परिसरातील दक्ष आणि सामाजिक भान जपणाऱ्या पत्रकारांनी या समस्येचा अत्यंत गांभीर्याने व आक्रमकपणे पाठपुरावा केला होता. या पत्रकारांनी थेट पोलीस ठाण्यात भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांना जाब विचारल्यामुळे आणि प्रसारमाध्यमांतून या धोक्याची जाणीव करून दिल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसह समाजमनही जागे झाले. ​या दक्ष पत्रकारांच्या बातमीची आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याची तातडीने दखल घेत, कोणतेही पद किंवा सत्ता नसताना सामाजिक, शैक्षणिक, ...
Image
राज्यस्तरीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत रायगड जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी!  ४४ सुवर्णपदकांसह प्रथम अजिंक्यपद  ​ छत्रपती संभाजीनगर, दि. ३ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र थाईबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने २५ आणि २६ जुलै २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय थाईबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्याने आपले वर्चस्व प्रस्थापित करत सर्वसाधारण प्रथम अजिंक्यपद पटकावण्याचा मान मिळवला आहे. या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करत तब्बल ४४ सुवर्ण, २१ रौप्य आणि ८ कांस्यपदकांची कमाई केली. या नेत्रदीपक यशामुळे रायगड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून विजेत्या सर्व खेळाडूंची येत्या २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान नांदेड येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. ​या स्पर्धेत स्नेहा राऊत, अनिकेत दुशिंग, चैत्राशी काकडे, मयूर जाधव, स्वस्तिक भोसले, फिरोज अन्सारी, ऋषिकेश कुमार, करण शिरोडकर, अनन्या पाटील, मनमय झट, वर्धन कदम, एलीजा आदाकुल्ला, मानव बहेकर, मृगाक्षी पॉल, अथर्व मसुरकर, नक्ष मोरे, श्री...
Image
​शिहू–बेणसे विभागातील वीजसमस्येवर तोडगा! शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वात आढावा बैठक संपन्न पेण-रायगड, दि. ३० (प्रतिनिधी) :- शिहू–बेणसे विभागातील वीजपुरवठा अधिक सक्षम, स्थिर आणि अखंडित राहावा या उद्देशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हासंपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या विशेष पुढाकाराने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, पेणचे उपअभियंता श्री. थत्ते, तसेच सहाय्यक अभियंता श्री. तांदळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत शिहू-बेणसे परिसरातील वीजसमस्येशी संबंधित पूर्वी झालेल्या निर्णयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आणि प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. ​बैठकीदरम्यान परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध तांत्रिक उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली. याअंतर्गत पुढील दोन ते तीन दिवसांत नागोठणे फिडर आणि पांडापूर फिडरच्या सहाय्यक अभियंत्यांकडून संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय...
Image
लिटल स्टार्स इंग्लिश हायस्कूलमध्ये एसएससी गुणवंत व उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा संपन्न वरळी-मुंबई, दि. २७ (प्रतिनिधी) :- प्रभादेवी व वरळी परिसरातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या वरळी येथील प्रतिष्ठित 'लिटल स्टार्स इंग्लिश हायस्कूल' मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सर्वांगीण कामगिरीचा गौरव करण्यासाठी एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात पार पडला. मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या एसएससी बोर्ड परीक्षेत शाळेने १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून, याच दैदिप्यमान यशाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि गुणवंतांच्या कौतुकासाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ​या सोहळ्याला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यामध्ये गुजराती संस्कार मंडळाचे अध्यक्ष श्री. बिपीन भटाविया, सचिव सौ. सुजाता शहा, खजिनदार श्री. दिनेश नागडा आणि सदस्य सौ. आरती त्रिवेदी यांनी...
Image
'सेवा, संवेदनशीलता आणि नवोपक्रम'चा संकल्प रोहा लायन्स क्लबच्या ५३ व्या पदग्रहण सोहळ्यात मिलन शाह अध्यक्षपदी विराजमान रोहा-रायगड, दि. २७ (प्रतिनिधी) :- समाजसेवेची ५३ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या लायन्स क्लब ऑफ रोहाच्या ५३ व्या पदग्रहण सोहळ्याचा दिमाखदार उत्सव शुक्रवारी अक्षय लॉन्स, निवी रोड, रोहा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी लायन ॲड. मिलन शाह यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. समाजसेवेचा वारसा जपत "सेवा, संवेदनशीलता आणि नवोपक्रम" या ब्रीदवाक्यासह त्यांनी नव्या कार्यकाळाची दमदार सुरुवात केली. दानशूर व सेवाभावी स्वर्गीय हर्षदभाई शाह यांच्या समाजसेवेचा वारसा लाभलेले लायन ॲड. मिलन शाह यांनी यापूर्वी क्लबमध्ये सचिव, खजिनदार व उपाध्यक्ष या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुविधांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून परोपकारी, धार्मिक व सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानामुळे ते परिसरात आदराचे स्थान निर्माण करून आहेत. यावेळी लायन संजय एकल यांनी सचिव, लायन माया कौशिक शाह यांनी कोषाध्यक्ष...
Image
जय भवानी सहकारी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न ८ टक्के लाभांश जाहीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव रोहा-रायगड, दि. २७ (प्रतिनिधी) :- जय भवानी सहकारी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष पी. बी. सरफळे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक तसेच सुधारित उपविधींना सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली. सभेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, गणेशपूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपाध्यक्ष शंकरराव भगत, सचिव सुहास खरिवले, कोषाध्यक्ष सुनील सानप, संचालक सुनील ठाकूर, मनोहर मेहतर, दीपक जाधव, महेश बामगुडे, किशोर सकपाळ, संदीप सरफळे, हेमंत राणे, अंकुश वाघमारे, सुलभा पवार यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात संचालक महेश बामगुडे यांनी संस्थेच्या ३१ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर सचिव सुहास...
Image
तुळस डोईवर, सायकल हाती... भक्ती, आरोग्य आणि पर्यावरणाचा अनोखा संगम! ठाण्यात पर्यावरण आणि भक्तीचा संगम घडवणारी 'आषाढी सायकलवारी' उत्साहात संपन्न  ठाणे दुमदुमले विठ्ठल नामात!  ठाणे, दि. २७ (प्रतिनिधी) :- ​आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण ठाणे शहर "विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल!" आणि "जय जय राम कृष्ण हरी!" या अखंड नामघोषाने दुमदुमून गेले होते. या भक्तिमय वातावरणात पर्यावरण, आरोग्य, परंपरा आणि सामाजिक समतेचा एक अनोखा संगम ठाणेकरांना अनुभवता आला. चेंदणी कोळीवाडा जमात ट्रस्ट (ठाणे) आणि 'आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने एका अभिनव 'आषाढी सायकलवारी'चे आयोजन करण्यात आले होते. चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट (ज्याची स्थापना १४६५ मध्ये झाली आहे) आणि श्री आनंद भारती समाज (स्थापना १९१०) यांच्या वतीने सुरू असलेल्या ११६ व्या आषाढी अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून हा उपक्रम साकारण्यात आला. या सायकलवारीत तब्बल ३५ सायकलप्रेमींनी डोक्यावर तुळस आणि हाती सायकल घेत अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि समाजाला भक्तीसोबतच पर्यावरण...
Image
जनसंवाद संस्थेतर्फे आषाढी एकादशी उत्साहात साजरी मुलींच्या लेझीम दिंडीने रंगला परिसर तुळशी रोपांचे वाटप व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बोरीवली-मुंबई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा आणि वारकरी परंपरेचा वारसा जपणारी आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच परंपरेचा जागर आणि संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने जनसंवाद संस्था गेल्या १५ वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करत आहे. यावर्षी कष्टकरी महिला संघटना आणि जनसंवाद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली ती मुलींची लेझीम दिंडी. पारंपरिक वेशभूषेत लेझीम खेळत मुलींनी दिंडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमादरम्यान तुळशीच्या रोपट्यांचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित भाविक व नागरिकांना साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला. लेझीम दिंडीत सहभागी झालेल्या मुलींना त्यांच्या उपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. याशिवाय विविध सां...
Image
NEET पेपरफुटी व लडाखच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा तीव्र निषेध! शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी  ईश्वरपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन  ​वाळवा-सांगली, दि. २५ (प्रतिनिधी) :- दिल्ली येथील जंतर-मंतरवर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर आणि विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाकडून झालेला अमानुष लाठीचार्ज तसेच त्यांना दिलेली वागणूक अतिशय भयावह असून ही कृती लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. लेह-लडाखच्या घटनात्मक व संविधानिक अधिकारांसाठी तसेच नीट (NEET) परीक्षा घोटाळा व पेपरफुटीप्रकरणी लाखो विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत ठोस सुधारणा व्हाव्यात या मुख्य मागण्यांसाठी गेल्या ३० दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक व कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांचा सत्याग्रह असंविधानिक व गैरमार्गाने मोडीत काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीचा व असंविधानिक धोरणांचा तीव्र निषेध करण्यासाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने सांगली जिल्हाध्यक्ष विनोद आढाव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी उपविभागीय अध...
Image
विद्यार्थी उच्च शिक्षित होण्यासाठीच संस्थेचा जन्म - अध्यक्ष किशोर जैन गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमात केले प्रतिपादन नागोठणे-रायगड, दि. २४ (महेंद्र माने) :- येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या विद्यासंकुलनातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात संस्थेचे सस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांची अध्यक्षतेखाली बुधवार 22 जुलै रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, व्हाईस चेअरमन संगीता जैन, सीईओ कार्तिक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयातील उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणारे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी किशोर जैन यांनी संस्थेचा जन्म विद्यार्थी उच्च शिक्षित होण्यासाठीच झाला असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला आयुर्वेदिक कॉलेज प्राचार्य डॉ. ज्योती जगताप, डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज प्राचार्य डॉ. परवेश यादव, फार्मसी संस्था प्राचार्य डॉ. आशिष पगारिया, (अग्निशमन आणि सुरक्षा) प्राचार्य सतीश सुर्वे, शाळा प्रिन्सिपॉल अमृता गायकवाड यांच्यासह सर्व प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. भा.ए.सो.च्या विद्यासंकुलनातील श्रीमती शांतीबा...
Image
NEET पेपर फुटीप्रकरणी जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा पेणमध्ये वंचित बहुजन आघाडी व बहुजन विद्यार्थी संघटनेकडून तीव्र निषेध!  शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी  बेणसे-रायगड, दि. २४ (चंद्रकांत अडसुळे) :- राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (NEET) झालेल्या पेपर फुटीच्या प्रकरणात दोषी असणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवर तेथील पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज करत तीव्र मारहाण केली. दिल्ली पोलिसांच्या या दडपशाहीचा आणि अमानुष लाठीहल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज पेण येथे वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. ​आज सकाळी पेण येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर संघटनेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जंतर-मंतर येथील पोलीस अत्याचाराचा जाहीर निषेध नोंदवला. यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र...
Image
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज व काँग्रेस नेत्यांशी झालेल्या वागणुकीच्या निषेधार्थ उत्तर मुंबई काँग्रेसचे तीव्र आंदोलन बोरीवली-मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी) :- विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी, श्रीमती प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे खासदार व इतर वरिष्ठ नेत्यांशी पोलिसांकडून झालेल्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी उत्तर मुंबई काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार मा. असलम शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, भाजप सरकारच्या कथित दडपशाही व हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन निषेध नोंदविला. या आंदोलनाचे आयोजन आज, २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता, एस. व्ही. रोड, बोरीवली स्टेशनसमोर, बोरीवली (पश्चिम) येथे करण्यात आले आहे. उत्तर मुंबई काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या, युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच काँग्रेस विचारांचे नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन करण्या...
Image
NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनावरील लाठीहल्ल्याचा निषेध! उद्या पेण तालुका आणि महाराष्ट्र बंद  वंचित बहुजन आघाडीचे आवाहन  बेणसे-रायगड, दि. २२ (चंद्रकांत अडसुळे) :- राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (NEET) झालेल्या कथित पेपरफुटीच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वोच्च नेते मा. प्रकाशजी आंबेडकर यांनी उद्या (दि. २३ जुलै) महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. या घोषणेला प्रतिसाद देत उद्या पेण तालुका देखील पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पेण तालुक्यातील सर्व नागरिक, विद्यार्थी आणि पक्ष कार्यकर्त्यांनी या बंदमध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुका अध्यक्ष सुनील पी. धामणकर यांनी केले आहे. ​जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान पोलिसांनी ज्या प्रकारे विद्यार्थ्यांवर लाठीमार केला, त्याचा पेण तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आह...
Image
मनसेच्या मध्य रायगड जिल्हा सचिव पदी अमोल पेणकर यांची फेरनियुक्ती पक्षनिष्ठेची दखल; राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान  सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव  रोहा-रायगड, दि. २२ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, मध्य रायगड जिल्हा सचिवपदी अमोल पेणकर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील शिवतीर्थ येथे आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या हस्ते पेणकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अमोल पेणकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी रोहा शहराध्यक्ष, रोहा तालुकाध्यक्ष तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्ष या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम करत शहर, तालुका आणि जिल्हास्तरावरील अनेक संघटनात्मक उपक्रम, आंदोलने व जनहिताच्या प्रश्नांवरील लढ्यांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. रायगड जिल्ह्यातील अ...
Image
प्रकाश कोळी यांची रोहा शिवसेना शहरप्रमुखपदी निवड  शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण  ​रोहा-रायगड (प्रतिनिधी) :- रोहा शहरातील तरुण, अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून सर्वपरिचित असलेले प्रकाश कोळी यांची शिवसेना (शिंदे गट) रोहा शहरप्रमुखपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रोहा शहरप्रमुखपद रिक्त असल्यामुळे पक्षाच्या स्थानिक हालचालींना मर्यादा येत होत्या; मात्र आता प्रकाश कोळी यांच्या रूपाने अभ्यासू आणि तडफदार नेतृत्व मिळाल्याने पक्षाच्या स्थानिक संघटनेला मोठी नवसंजीवनी मिळण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या निवडीमुळे रोहा शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह विशेषतः युवा शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ​या महत्त्वाच्या नियुक्तीसाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे वरिष्ठ नेते तथा मंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर तसेच रायगड लोकसभा मतदारसंघप्रमुख अनिल नवगणे यांच्या आदेशानुसार प्रकाश कोळी यांच्यावर रोहा शहरप्रमुखपदाची ही...
Image
रायगडात एकही बनावट दिव्यांग आढळल्यास आधी जिल्हा शल्यचिकित्सकांची चौकशी करण्याची मागणी