अक्षय्य तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी रायगड प्रशासन सज्ज! नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई रायगड-अलिबाग, दि. १७ (प्रतिनिधी) :- जिल्ह्यामध्ये बालविवाहाची अनिष्ट प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. आगामी १९ एप्रिल २०२६ रोजी असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित केले जातात. या काळात ग्रामीण आणि आदिवासी भागांत बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि बाल कल्याण समितीसह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपायुक्त (बाल विकास) यांनी या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, अक्षय्य तृतीया किंवा आखातीजच्या काळात जिल्ह्यात एकही बालविवाह होता कामा नये. यासाठी धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, समुद्रकिनाऱ्यांवरील हॉटेल्स आणि पर्यटनस्थळांवर विशेष पाळत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल...