नागोठणे रिलायन्सच्या सेवानिवृत्त कामगारांचा निरोप समारंभ संपन्न भारतीय श्रमिक शक्तीसंघ कामगारांच्या पाठीशी ठाम - दिपकभाई रानवडे बेणसे-रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- भारतीय श्रमिक शक्तीसंघ युनियन ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठण्याच्या कामगारांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभी आहे. कोणत्याही कामगारावर अन्याय झाल्यास संघटना त्याला न्याय मिळवून देईल, असे प्रतिपादन शिवसेना नेते, कामगार नेते तथा भारतीय श्रमिक शक्तीसंघ युनियनचे केंद्रीय कार्याध्यक्ष दिपकभाई रानवडे यांनी केले. नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजमधून सेवानिवृत्त होणाऱ्या कामगार व पदाधिकाऱ्यांच्या निरोप समारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, कामगारांनी कंपनीचे नियम व 'स्टँडिंग ऑर्डर्स' आत्मसात करून आपले काम इमानेइतबारे करावे आणि स्वतःची सुरक्षितता अबाधित ठेवावी, असे आवाहनही शेवटी केले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमधून आगामी ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त होत असलेले भारतीय श्रमिक शक्तीसंघ युनियनचे अध्यक्ष श्री. संजयभाई काकडे, सचिव श्री. सुधीरभाई पारंगे, वरिष्ठ पदाधिकारी श्री. अजिमभाई बेणसेकर तसेच भारतीय क...