Posts

ब्रेकिंग न्यूज
🚨 रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार... अनेक तालुक्यांचा संपर्क तुटला... नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी... उरण, पनवेल आणि खालापूरमध्ये मुसळधार पूरपरिस्थिती... वाहतूक ठप्प, नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू 🚨
Image
​ आश्वासन हवेतच; मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था! खड्ड्यांमुळे कोकणवासीयांचा प्रवास पुन्हा खडतर बेणसे-रायगड, दि. ८ (चंद्रकांत अडसुळे) :- ​केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जून महिन्यापर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे उर्वरित काम पूर्ण होऊन कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास निर्विघ्न होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. मात्र, जुलै महिना उजाडला तरी महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही, उलट अपूर्ण काम असलेल्या ठिकाणी रस्त्याची मोठी दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे काम संथ गतीने आणि अपूर्णावस्थेत सुरू असून, या वर्षी तरी हे काम पूर्ण होऊन कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होईल अशी मोठी अपेक्षा होती. परंतु, ठेकेदारांच्या कमालीच्या निष्क्रियतेमुळे याही वर्षी कोकणची वाट खडतरच असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. सद्यस्थितीत नागोठणे आणि गडब परिसरात महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, उड्डाणपूल व अन्य पुलांची कामेही रखडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक मनस्ताप सहन करावा ...