Posts

ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨
Image
स्वातंत्र्याची ८० वर्षे उलटूनही आदिवासी वाड्यांना रस्ता नाही! गरोदर महिला व रुग्णांसाठी डोलीचाच आधार  निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा  नागोठणे-रायगड, दि. २५ (महेंद्र माने) :- देशाला स्वातंत्र्य मिळून आठ दशके लोटली तरी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाबळ ग्रामपंचायत हद्दीतील गौळावाडी आणि पावटावाडी या आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. स्वातंत्र्याची ८० वर्षे उलटूनही या वाड्यांना जोडणारा पक्का रस्ता तयार न झाल्याने येथील ग्रामस्थांना अत्यंत खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती बिकट बनत असून गरोदर महिला, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी चक्क डोलीचा आधार घ्यावा लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही रस्ता होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता जोपर्यंत पक्का रस्ता होत नाही, तोपर्यंत प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. ​मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलेटी येथून जांबोशी गावापर्यंत डांबरी रस्ता झाला असून तिथून वाहतूक सुरू आहे. मात्र, जांबोशी गावापासून पुढे गौळावाडी आणि पावटावाडीक...