मुंबईमध्ये एस. सी. उपवर्गीकरणा विरोधात आंबेडकरी समाजाचा विराट मोर्चा! आझाद मैदानामध्ये जनसागर उसळला माणगाव-रायगड (उत्तम तांबे) :- महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती (एस.सी.) अंतर्गत ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण करण्याचा घाट घातला असून, या प्रस्तावाला आंबेडकरी समाजातून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. या अन्यायी निर्णयाविरोधात आणि आरक्षणाच्या मूळ चौकटीचे रक्षण करण्यासाठी ३० जून २०२६ रोजी मुंबईत आंबेडकरी समाजाच्या वतीने एक ऐतिहासिक आणि विराट मोर्चा काढण्यात आला. बौद्धजन पंचायत समितीचे सभापती तथा रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला. मेट्रो सिनेमा येथून सुरू झालेला हा महामोर्चा विधानभवनाच्या दिशेने निघाला असता, संपूर्ण मुंबई परिसर निळ्या झेंड्यांनी आणि गगनभेदी घोषणांनी दणाणून गेला. या अभूतपूर्व जनसमुदायामुळे आझाद मैदानामध्ये जणू काही निळा जनसागरच लोटला होता. या विराट सभेला संबोधित करताना रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी अत्यंत आक्रमक आणि संघर्षमय विचार मांडले. ते म्हणाले की, अनुसू...