खोपोलीत विद्यार्थ्यांसाठी ‘दिल, दोस्ती, दुनियादारी’ संवाद तरुण मनांच्या भावविश्वावर परिपक्व संवादाची उजळणी खोपोली (दिनकर भुजबळ) :- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, भावनिक समज आणि सामाजिक भान विकसित व्हावे, या हेतूने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, खोपोली शाखेतर्फे विद्यार्थ्यांसाठी “दिल, दोस्ती, दुनियादारी” हा संवेदनशील आणि विचारप्रवर्तक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ ते ९:३० या वेळेत हा उ पक्रम प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित आनंद शाळा व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथे इयत्ता ११ वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी पार पडला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सरचिटणीस आरती नाईक या संवादक म्हणून उपस्थित होत्या. संवादादरम्यान रिलेशनशिप, ब्रेकअप, लव्ह अॅट फर्स्ट साइट यांसारख्या तरुणाईला भेडसावणाऱ्या विषयांवर मोकळेपणाने चर्चा करण्यात आली. प्रेम आणि आकर्षण यातील सूक्ष्म फरक स्पष्ट करताना, प्रपोजल कसे हाताळावे, प्रेमात असताना कोणत्या बाबींबाबत सजग राहावे, नकार कसा द्यावा आणि नकार स्वीक...