'बार्टी'चा कारभार रामभरोसे; सहा महिन्यांपासून बैठक नाही तर तीन महिन्यांपासून महासंचालक पद रिक्त विद्यार्थ्यांचे विद्यावेतन रखडले; महत्त्वाच्या योजनांचे भवितव्य अधांतरी, प्रशासकीय व्यवस्था विस्कळीत बेणसे-रायगड (चंद्रकांत अडसुळे) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ही राज्यातील हजारो वंचित व गरजू विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांचे मुख्य केंद्र मानली जाते. मात्र, सद्यस्थितीत या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेचा कारभार पार कोलमडला असून, विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांचे भवितव्य पार अधांतरी सापडले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून संस्थेच्या नियामक मंडळाची एकही बैठक झालेली नाही, तर मागील तीन महिन्यांपासून संस्थेला नियमित महासंचालकच मिळालेला नाही. परिणामी, संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर कमालीचा विपरीत परिणाम होत असून, विद्यार्थ्यांच्या हिताच्या अनेक महत्त्वाच्या योजना आणि निर्णय प्रलंबित राहिल्याने सद्या 'बार्टी'त नेमके चाललेय तरी काय, असा संतप्त प्रश्न विद्यार्थी आणि पालकांमधून उपस्थित केला जात आहे. 'बार्टी'मध्ये मुख्य मह...