दुःख आणि वेदना पचवून जिद्दीने उभी राहणारी माणसेच मोठी होतात - आदिवासी कन्या ॲड. सपना वाघमारे छत्रपती शिक्षण मंडळाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात गुणगौरव कल्याण वृत्त, दि. १८ (भिवा पवार) :- "जी माणसं दुःख आणि वेदना पितात, तीच माणसं आयुष्यात मोठी होतात. माणसाने दुःख आणि वेदना पचवायला शिकले पाहिजे, कारण याच संघर्षातून माणसाला खरे बळ मिळते. तुमच्या मनात जर खरी जिद्द असेल, तर तुम्ही कोणत्याही खडतर परिस्थितीवर मात करू शकता. शिक्षण घेत असताना वाटेत कितीही दुःख किंवा वेदना आली, तरी परिस्थितीसमोर कधीही डगमगू नका. आपला निर्धार कायम ठेवून दुःखाला धैर्याने सामोरे जाणे, यातच यशाची खरी गुरुकिल्ली दडलेली आहे," असे प्रेरणादायी प्रतिपादन लंडन विद्यापीठात एलएलएम (LLM) उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या कोलाड चिंचवली येथील ॲडव्होकेट कुमारी सपना वाघमारे यांनी केले. छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण आयोजित माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा २०२६ च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या. कल्याण येथील अभिनव विद्यामंदि...