मधमाशा पालन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकरी व सर्वसामान्यांसाठी सुवर्ण संधी अलिबाग-रायगड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'मधकेंद्र (मधमाशा पालन) योजना' संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दि.18 जून 2019 च्या शासन निर्णय नुसार कार्यान्वित आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकरी आणि सर्वसामान्य मधपाळांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे हा असून मधकेंद्र (मधमाशा पालन) योजना शेतकरी व सर्वसामान्यांसाठी सुवर्ण संधी असल्याची माहिती प्र.जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रायगड-अलिबाग यांनी दिली आहे. मधमाशी पालनाचे मुख्य फायदे : आर्थिक उत्पन्न: मध आणि मेणाची विक्री करून उत्तम नफा मिळतो. शेती पिकांमध्ये वाढ: मधमाश्या परागीभवन करतात, ज्यामुळे पिकांचे उत्पादन 30 ते 40 टक्क्यांनी उत्पन्न वाढते. उद्योगाची निर्मिती: रॉयल जेली, प्रोपोलिस आणि मधमाशांचे विष या मौल्यवान उत्पादनांची विक्री करता येते. कमी खर्च: या व्यवसायासाठी खूप कमी जागा आणि भांडवल लागते.पूरक व्यवसाय: शेतीसोबत हा व्यवसाय सहज करता येतो. योजनेचे स्वरूप आणि लाभ : या योजनेअंतर्गत ला...