Posts

ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨
Image
ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज - कामगार नेते दिपकभाई रानवडे ​बेणसे-रायगड, दि. ६ (चंद्रकांत अडसुळे) :- वाढत्या जागतिक तापमानाला (ग्लोबल वॉर्मिंग) आळा घालण्यासाठी झाडे अत्यंत उपयुक्त ठरतात. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि मानवी अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्षलागवड ही आजच्या काळाची सर्वात महत्त्वाची गरज बनली आहे. वाढते प्रदूषण, ऑक्सिजनची कमतरता आणि ऋतूचक्रात होणारे बदल रोखण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे जतन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते श्री. दिपकभाई रानवडे यांनी केले. भारतीय श्रमिक शक्ती संघ (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे युनिट) आणि भारतीय कामगार सेना (रिलायन्स नागोठणे युनिट) यांच्या संयुक्त विद्यमाने कडसुरे येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, हे केवळ वृक्षारोपण नसून एक सामाजिक कर्तव्य आहे. फक्त झाडे लावणे पुरेसे नसून, लावलेले प्रत्येक रोप मोठे होईपर्यंत त्याचे संगोपन करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. ​या का...