अवैध सावकारीच्या तक्रारी तातडीने निकाली काढा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया अहिल्यानगर, दि. १९ (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात अवैध सावकारीमुळे शेतकरी, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा. संबंधित प्रकरणांमध्ये नोटीस पोहोच झाल्याची खात्री करूनच गुणवत्तेवर निर्णय घ्यावेत. जिल्ह्यातील पीडित शेतकरी व नागरिकांनी भीती न बाळगता पुढे येऊन अवैध सावकारांविरोधात तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत गठीत त्रिसदस्यीय समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली, त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. बैठकीस जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, गरजू नागरिक, व्यावसायिक व शेतकऱ्यांनी अवैध सावकारांकडून कर्ज घेऊ नये. सहकार विभागाकडून परवाना प्राप्त सावकारांकडूनच कर्ज घ्यावे, जेणेकरून अवैध सावकारीला पायबंद बसेल. अवैध सावकारांकडून जादा व्याज आकारून ...