राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली! २०.५५ कोटींची तडजोड रायगड-अलिबाग, दि.१० (प्रतिनिधी) :- दाखलपूर्व व प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा तसेच सामोपचाराने वाद मिटावेत या उद्देशाने रायगड जिल्ह्यात ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र द. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या लोक अदालतीत वादपूर्व व दाखल अशी एकूण ७ हजार ७८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये तब्बल २० कोटी ५५ लाख २० हजार ६१५ रुपयांची तडजोड करण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र द. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी अलिबाग येथील न्यायिक अधिकारी, वकील संघटनेचे उपाध्यक्ष अनंत पाटील, सचिव अमित देशमुख तसेच जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी, वकील वर्ग आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशभरात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. रायगड जिल्ह्यात या लोक अदालतीसाठी २५ हजार ६८१...