🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨
जन स्वाभिमान बहुउद्देशीय संघटना, महाराष्ट्र तर्फे गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व खाऊचे वाटप


अलिबाग (प्रतिनिधी) :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन करण्यात आलेले असून अशा परिस्थितीत संचारबंदीमुळे अनेक गरजू कुटूंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत गरजू कुटूंबांना मदतीची अपेक्षा असते. दरम्यान, अशा गरजू कुटूंबांना जनस्वाभिमान बहुउद्देशिय संघटना, महाराष्ट्र तर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे.
जन स्वाभिमान बहुउद्देशीय संघटना, महाराष्ट्र तर्फे श्री समर्थ कृपा वृध्दधाम, परहूर येथे रेशन तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
या संघटनेमार्फत कावाडे, रेवस, नवखार येथील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याबद्दल सर्व लाभार्थी कुटुंबानी संघटनेचे आभार मानले आहेत. या संघटनेतर्फे समीर राणे, गुरुनाथ पाटील, जगदीश घरत, गुंजाळ सर, मनोज शिर्के, प्रणय पाटील, कंठक मॅडम आदींनी गरजू नागरिकांसाठी हा समाजोपयोगी उपक्रम राबविला. 

Comments

Popular posts from this blog