ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨
जन स्वाभिमान बहुउद्देशीय संघटना, महाराष्ट्र तर्फे गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व खाऊचे वाटप


अलिबाग (प्रतिनिधी) :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन करण्यात आलेले असून अशा परिस्थितीत संचारबंदीमुळे अनेक गरजू कुटूंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत गरजू कुटूंबांना मदतीची अपेक्षा असते. दरम्यान, अशा गरजू कुटूंबांना जनस्वाभिमान बहुउद्देशिय संघटना, महाराष्ट्र तर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे.
जन स्वाभिमान बहुउद्देशीय संघटना, महाराष्ट्र तर्फे श्री समर्थ कृपा वृध्दधाम, परहूर येथे रेशन तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
या संघटनेमार्फत कावाडे, रेवस, नवखार येथील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याबद्दल सर्व लाभार्थी कुटुंबानी संघटनेचे आभार मानले आहेत. या संघटनेतर्फे समीर राणे, गुरुनाथ पाटील, जगदीश घरत, गुंजाळ सर, मनोज शिर्के, प्रणय पाटील, कंठक मॅडम आदींनी गरजू नागरिकांसाठी हा समाजोपयोगी उपक्रम राबविला. 

Comments

Popular posts from this blog