रोह्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उस्ताहात साजरा
रोहा : प्रतिनिधी
1ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन जगभरात साजरा केला जात असतो. रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात ज्येष्ठ नागरिक दिन म्हणजे वृद्ध दिन मोठ्या उस्ताहात साजरा करण्यात आला.
यावेळी 80 वर्ष पार केलेल्या व अजुनही जगण्याची प्रबळ इच्छा शक्ती असलेल्या ज्येष्ठ नागरिक विट्ठलराव उर्फ व्ही टी देशमुख, सुधाकर अण्णा वालेकर, यशवंंत देशमुख (शेनवई) अमिना रोहेवाला, भाई शीलधनकर, वनिता पाडसे, हिरामण नागोठकर, मधुकर हातकमकर सर, हरिचंद्र उशिरकर, बाळाराम खरिवले, रामभाऊ शिर्के, अनंत गुरव, रामचंद्र सुर्वे, अशा इतर 20 ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपिठावर मंडळाचे अध्यक्ष पा. बा. सरफळे (रावसाहेब) उपाध्यक्ष शांताराम गायकवाड, सचिव सुरेश मोरे, खजिनदार प्रकाश पाटिल. व्ही टी देशमुख. वकील मनोहरे, मेहेंदळे सर, शरद गुडेकर, सुधाकर वालेकर, नंदकुमार भादेकर सर, सौ. शैलजा देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कयदेविषयक मार्गदर्शन करताना वकिल मनोहरे यांनी सांगितले की 2007 साली जेष्ट नागरीकांना आत्म सन्मान मिळावा याकरिता सरकारवर कायदा काढण्याची वेळ आली. त्यानुसार वृद्धांना आपला न्याय हक्क मागता येतो. सदर प्रांताधिकारी यांच्याकडे कोर्ट चालवला जातो. वृद्धांना मुले विचारीत नसतील तर पोटगी दिली जाते. तर जमीन विषयक बाबतीत जर वृद्धांची फसवणूक झाली असेल तर सदर जमिनीची कागद पत्रे रद्द केली जातात व निराधार ज्येष्ठांकरिता शासनाच्या अनेक योजना आहेत त्याचा ही लाभ आपण घेतला पाहिजे. असे मार्गदर्शन मनोहरे मैडम यांनी केले. तर यावेळी नागोठणे (शेतपळस) चे ह.भ.प. हिरामण नागोठकर यांचा वयाचे 80 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.त्यावेळी सत्कारला उत्तर देताना ते म्हणाले की माणुस हा 50 टक्के डॉक्टर असला पाहिजे. ज्येष्ठांनी डॉक्टरांच्या आहारी जाण्यापेक्षा निसर्गाच्या अहारी जा. हलकासा व्यायाम करा. कितीही व्याधी आली, उतारवयात संकटे आली तरी हिंमत हारु नका. उतारवयात आपण सन्यासी आहोत असे समजून आपला तामसीपना सोडावा. राग बाळगू नका. आनंदी जगा असे मार्गदर्शन नागोठकर यांनी उपस्तीत ज्येष्ठ नागरिकांना केले.
तर मेहंदळे सर यांनी ज्येष्ठ नागरिक हा दिन इतर देशांमधे 100 वर्षांपूर्वी सुरूवात झाली व आपल्या देशामधे 1977 पासून सुरवात झाल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरीकांचा आता संपर्क कमी होत चालला असुन ज्येष्ठांनी आता नातवंडाचा विचार न करता आपले आयुष्य सुंदर जगावे. व्यायाम करा. पुर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. लोकसंख्या कमी होती. आता घरात अवघी दोन माणसे, मात्र लोकसंख्या अफाट वाढली. घरातील संख्या मात्र कमी झाली. घरे मोठी पण मने मात्र लहान झाली. म्हणून यापुढे आरोग्य जपा. पूर्वी म्हणायचे दुःख अणि कर्ज याबाबतीत कुणाला तरी सांगून मन हलके केले पाहीजे. असे मार्गदर्शन मेहंदळे यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य औषोधपचार याविषयी माहिती आरती घोसाळकर यांनी तर आरोग्य विषयक मार्गदर्शन डॉक्टर वेदक यानी केले. तर रोहा महसूल खात्याला, पोलिस प्रशासनाला निमंत्रन देऊन सुद्धा या कार्यक्रमाला कोनी उपस्तीत न राहिल्याने कार्यक्रमात नाराजी वेक्त करण्यात आली. यावेळी प्रास्थाविक अध्यक्ष पी.बी सरफळे यांनी तर सूत्रसंचालन सुरेश मोरे व आभार शांताराम गायकवाड यानी मानले.व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार प्रकाश पाटिल ,मंडळाचे सदस्य शरद गुडेकर,सुधाकर अण्णा वालेकर. मारुती राऊत, सौ शैलेजा देसाई, नंदकुमार भादेकर, चंद्रकांत गावडे,शेखर गुंड, हरीचंद्र माळी, नारायण पाटील यांनी अथक मेहनत घेतली. वनिता पाडसे, हिरामण नागोठकर, मधुकर हातकमकर सर, हरिचंद्र उशिरकर, बाळाराम खरिवले, रामभाऊ शिर्के, अनंत गुरव, रामचंद्र सुर्वे, अशा 20 ज्येष्ठ नागरिकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.