वृक्षारोपण करुन दिला पर्यावरण प्रेमाचा संदेश "निगूडशेत प्रिमियर लिग" च्या टिम्सचा कौतुकास्पद उपक्रम तळा (विशेष प्रतिनिधी) :- तळा तालुक्यातील निगूडशेत गावातील ग्रामस्थ, युवक आणि महिलांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा आणि निसर्गावरील प्रेमाचा संदेश दिला आहे, तब्बल तीन किलो मीटर अंतर रस्त्याच्या दुतर्फा शेकडो झाडे लावून वृक्षारोपण केले. निगूडशेत गावातील "निगूडशेत प्रिमियर लिग" च्या टिम्सने आयोजित केलेला भव्य वृक्षारोपणाचा उपक्रम रविवारी पार पडला. गावातील आणि मुंबईतील असंख्य ग्रामस्थ, महिला, तरुणांनी हातात झाडे, पावडे, टिकाव घेऊन वृक्षारोपणाचा सोहळा साजरा केला. या वेळी शेकडो झाडांची लागवड करण्यात आली. लावलेली झाडे संवर्धन करून मोठी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यासाठी उपस्थित प्रत्येकाने झाड दत्तक घेण्याचा संकल्प केल्याचे सरपंच अनिता सरफळे आणि ग्रामपंचायत सदस्य रामदास मोरे यांनी सांगितले. दरम्यान संपूर्ण निगूडशेत गावातील आणि मुंबईकर ग्रामस्थ वृक्षरोपणात सहभागी झाल्याने सबंध तालुक्याला आगळा वेगळा संदेश मिळाल्याचे अधोरेखीत झाले. याप्रसंगी वृक्षारोपणासाठी ...
साई बौद्ध विकास मंडळाच्या उपोषणाला यश; अनाधिकृत बांधकाम तोडण्याची अधिकाऱ्यांची ग्वाही माणगांव (उत्तम तांबे) :- माणगांव तालुक्यातील साई बौद्धवाडी येथील बौद्ध समाजाच्या मालकीच्या जागेत अनाधिकृत अंगणवाडी करता बांधकाम करण्यात आले होते. १८ जानेवारी २०२४ रोजी सदर अनाधिकृत बांधकामाला सुरुवात केली असता त्यावेळी तेथील ग्रामस्थ त्या ठिकाणी विचारपूस करिता गेले असता साई ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ करून धमकावले होते या प्रकाराबाबत माणगाव पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी न्याय मागण्याकरिता तक्रार दाखल केली होती. तसेच याबाबत अंगणवाडी संबंधित कार्यालयाला तक्रार पत्र सादर केले होते. सदरची अंगणवाडी बांधण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याने साई बौद्धवाडीतील ग्रामस्थांना विश्वासात न घेता, साई ग्रामपंचायत उपसरपंच यांनी बौद्ध समाजाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले होते. ग्रामपंचायतच्या कोणताही ठराव नसताना सदर बांधकामाबाबत निविदा जाहीर न करता, जागेबाबत सहमती न घेता सदर ठेकेदारांनी अंगणवाडी बांधकाम सुरू केले होते. सदर अनधिकृत बांधकामाबाबत वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थ निवेदन ...
गोवंश हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करा! माणगांव तालुका सकल हिंदू समाजाचे माणगांव तहसीलदारांना निवेदन माणगांव (प्रमोद जाधव) :- माणगांव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात वाढत असलेले गोवंश हत्येचे प्रकार, गोवंश मांस वाहतूक व बेकादेशीररित्या विक्री यावर पूर्ण:त कडक निर्बंध लाऊन असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याने याकडे विशेष लक्ष केंद्रित करावे. यासाठी माणगांव तालुका गो रक्षा गोसंवर्धन समितीचे अध्यक्ष तथा जनसेवा संघटना माणगांव चे संस्थापक अध्यक्ष ॲड. अनिकेत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव तालुक्यातील विविध हिंदू संघटना व गोवंशप्रेमी संघटना यांच्या माध्यमातून १९ जून रोजी माणगाव तहसीलदार विकास गारूडकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात रायगड जिल्ह्यात गोवंश हत्येचे प्रमाण गेल्या वर्षभरापासून वाढत चाललेले आहे. गोवंशाची दिवसाढवळ्या कत्तल करीत आहे. पोलीस प्रशासनाला त्याविषयी पूर्व कल्पना, माहिती देऊनसुद्धा हत्या रोखण्यात अपयशी ठरत आहे. दिनांक १८ जून रोजी महाड जवळील इसाने कांबळे येथे गोरक्षक आणि आणि पोलीस प्रशासन यांच्यावर जमावाने हल्ला केला. त्य...