🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

भातपिकासह भाजीपाला लागवडीवर अवकाळी पावसाचा फटका

शिहू : प्रतिनिधी

रायगड जिल्हासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे ग्रामीण भागातील शिहू, चोले, गांधे, तरसेत, जांभूळटेप सह अनेक शेतकऱ्यांनाअवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

या  अवकाळी पावसामुळे भातपिकासह, भाजीपाला व कडधान्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. रायगड सह बऱ्याच तालुक्यात बुधवार व गुरुवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावळ्यामुले सर्वांचीच तारांबल उडाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्हात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बुधवार व गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाताची मळणी व भाजीपाला लागवड केलेल्या जागेत पानी साचून राहिल्यामुळे रोप पूर्ण कुजून गेली आहेत तसेच भाताच्या मळणी मध्ये पाणी गेल्यामुळे गुरांच्या वैरणीचा प्रश्न ऐरनीवर आला आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यामुळे आता पुढे जगायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांनसमोर आहे. शासनस्तरावर आता कोणता निर्णय घेतला जाईल या कडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments

Popular posts from this blog