🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

पनवेल आणि नवी मुंबई परिसरात बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू! 

बेकायदा जुगार क्लबला पोलीस ठोकतात सलाम? 

तक्रार करणाऱ्यांना पोलीस अधिकारी करतात 'ब्लॉक' 

ॲड. काशिनाथ ठाकूर यांच्याकडून कारवाईची मागणी 

रायगड (प्रतिनिधी) : पनवेल आणि नवी मुंबई परिसरात बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असल्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालल्याची तक्रार प्रहार जनशक्ती संघटनेचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. 

पनवेल तालुक्यातील सुकापूर येथे टायटन बार च्या समोर 'राज सोशल क्लब' नावाचा पत्त्यांचा जुगार क्लब राजरोसपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे कामोठे येथील सेक्टर १४ येथील झिंगाट बारच्या 'समोर विनम्र सोशल क्लब' नावाचा बेकायदा जुगार क्लब सुरू आहे. तसेच, पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी येथे भाजपा कार्यालयासमोर 'साईश्रद्धा क्लब' नावाचा बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू आहे. 

या भयानक प्रकारामुळे पनवेल आणि नवी मुंबई परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे स्पष्ट होत चालले आहे. विशेष म्हणजे या बेकायदा जुगार क्लबना पोलीसांचा वरदहस्त असल्याचे दिसून येत आहे. कारण एखाद्या तक्रारदाराने जर या बेकायदा जुगार क्लब विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तर संबंधित वरिष्ठ अधिकारी हे त्या तक्रारदारांचा नंबर 'ब्लॉक' करतात! त्यामुळे येथील वरिष्ठ अधिकारी हे जुगार क्लब चालकांच्या 'ताटाखालचे मांजर' बनले असल्याचे स्पष्ट होत चालले आहे आणि विशेष म्हणजे असे पोलीस अधिकारी म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली कीड आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! कायदा आणि सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने 'पोलीस' हा एक महत्वाचा घटक समजला जातो, परंतु एखाद्या ठिकाणी जर पोलीसच अवैध धंद्यांची पाठराखण करून त्यांना अभय देत असतील तर....? हा 'कुंपणाने शेत खाण्या'चा प्रकार आहे असेच म्हणावे लागेल! परिणामी अशा पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती संघटनेचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog