🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

वारसा परंपरेचा, सण गौराईचा, सुवासिनींच्या आनंदाचा

रोहा (समीर बामुगडे) : गणरायाचे आगमन घराघरात मंगलमय वातावरणामध्ये झाले आहे. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र नवचैतन्य पसरले आहे, अशातच गणरायाच्या पाठोपाठ येणाऱ्या गौराईमातेच्या आगमनाची महिला वर्गाला उत्सुकता लागलेली असते.

गौरीचा सण हा आगरी-कोळी महिलांसाठी एक वेगळा उत्साह वाढवणार सण असतो. प्रत्येक सुवासिनीला माहेरून सुप (ओवसा) दिला जातो, सुप हा बांबू पासून तयार केला जातो त्या मध्ये फळ, मिठाई, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून सुप भरला जातो व तो सुप गौरी पुढे ओवसला जातो. आपल्या पतीच्या व कुटुंबाच्या सुख-समृद्धी साठी गौराई मातेला साकडं घातलं जात.ग्रामीण भागातील महिला आपल्या परंपरे  नुसार गौरी मातेला विनंती करतात (आई गौरी येतच जा, तुला ओवसा देतच जा, मला बांबूच्या कांबी चा, तुला सोन्या सुवर्णाचा) अशा प्रकारे गौराईला साकडे घातले जाते.

गौरीच्या आगमनाने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले असते. ठीकठिकाणी वेगवेगळ्या परंपरेने गौरीचे पूजन केले जाते. नैवेदे म्हणून खीर, पोळी, घावन केले जातात. गौरी पूजना नंतर दुसऱ्या दिवशी गणराया सोबत गौरी मातेचे विसर्जन केले जाते. कोरोनाच्या पार्शवभूमीवर ग्रामीण भागातही शासनाच्या नियमांचे पालन करून सणांचा वारसा जोपसला जातो.

Comments

Popular posts from this blog