🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

पाटणूस-भिरा रस्ता पूर्ण तुटला, रस्त्यावरून वाहतायत पाण्याचे झरे!

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील पाटणूस भिरा रस्ता पूर्ण तुटला असून रस्त्यावरून आता पाण्याचे झरे वहात आहेत. 21, 22 जुलै ला झालेली तुफान पर्जन्यवृष्टी, देवकुंड पर्यटनासाठी होत असलेली वाहनांची गर्दी तसेच जिल्हा परिषदेकडून गेली 15 वर्षे पाटणूस-भिरा रस्त्याकडे झालेले दुर्लक्ष व टाटा पॉवर भिरा यांचे "कळतंय पण वळत नाही" या भूमिकेमुळे पाटणूस-भिरा या रस्त्याची अशी अवस्था झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.  

पालकमंत्री अदितीताई तटकरे यांनी देवकुंड पर्यटसनासाठी आराखडा तयार करण्यास मंजुरी दिली असून पावसाळा संपल्यानंतरच या कामाला गती येईल असे एकंदरीत पावसाळी हवामानावरून स्थानिकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे रस्ता कितीही खराब झाला तरी पावसाळा संपल्याशिवाय तरी रस्त्याचे काम होणार नाही हे आता जवळपास ग्रामस्थांना कळून चुकले आहे. त्यामुळे रस्ता कितीही तुटला तरी ग्रामस्थांना या रस्त्यावरुन ये जा करावीच लागणार आहे. तूर्त पावसाळा सुरू आहे तोपर्यंत निदान रस्त्यावरील खड्डे तरी जिल्हा परिषद कडून भरण्यात यावेत अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.

Comments

Popular posts from this blog