🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

माणगांव बाजारपेठेत वानराचा मुक्त संचार


माणगांव बाजारपेठेत वानराचा मुक्त संचार 


माणगांव (प्रतिनिधी) :- गुरुवारपासून माणगांव शहरातील बाजारपेठेत जंगली वानराचे आगमन झाले आहे, हे वानर बाजारपेठेतील दुकांनामध्ये मुक्त संचार करताना दिसत आहे, अशा प्रकारच्या वानराचे आगमन हे बाजारपेठेत फिरणारे नागरीक आणि व्यापाऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय बनला आहे. हे वानर गुरुवारी माणगांव बाजार पेठेत जुने एस टी स्टँड, सर्वोदय हाँस्पिटल, कचेरी रोड या परिसरात वावरताना दिसले. वानराला पाहण्यासाठी लहान मुलांची देखील मौजमजा झाली. याच परिसरात फेरीवाले, फऴविक्रेते, भाजीविक्रेते यांची दुकाने असल्याने फऴे आणि भाजी खाण्यासाठी वानराची चंगऴ ऊडाली होती. एखादा विक्रेता जवऴ आल्यास हे वानर अगदी सहजतेने बिलगताना पहावयास मिऴत होते. त्यामुऴे हे कदाचित माणसाऴलेले असल्याचा भास होतो होता.
       अशा प्रकारची वानराची प्रजात ही माणगांव तालुक्यातील टोऴ-आंबेत घाटरस्ता, नांदवी आंबेत घाट आणि साई घाटामध्ये प्रामुख्याने पहावयास मिऴते. कदाचित हे वानर तिथुनच कऴपातुन भरकटुन बाजारपेठेत आल्याची चर्चा देखील नागरिकांमध्ये होत आहे.
    मागील 5 वर्षांपुर्वी देखील अशाच प्रकारच्या एका वानराने माणगांव शहरात प्रवेश केला होता. मात्र ते जंगली असल्याचे भासत होते. पण हा वानर चर्चेचा विषय बनला असला तरी कारणे पर्यावरणाचा ढासऴता समतोल, अमर्याद व्रुक्षतोड, जंगली आपत्ती (वणवे) यांसारख्या कारणांमुऴे देखील जंगली प्राण्यांनी शहराचा रस्ता पकडला असावा हे नाकारता येणार नाही.
      हे वानर माणगांवकरांसाठी मौजमजा आणि कुतुहुलाचा विषय जरी बनले असले, तरी या गोष्टींकडे गांभिर्याने पहाण्याची देखील गरज आहे. याकरिता माणगांव तालुका सामाजिक वनीकरण विभाग (वनखाते) यांनी याकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे असे देखील माणगांवकर नागरीकांकडुन बोलले जात आहे..

Popular posts from this blog