रोह्यातील श्री धावीर मंदिर मार्गाचा भूसंपादनाचा तिढा सुटला नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्या शिष्टाईला यश; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण रोहा, दि. २८ (संदीप सरफळे) :- रोहा शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री धावीर महाराजांच्या मंदिर मार्गावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भूसंपादनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगराध्यक्षा कु. वनश्री समीर शेडगे यांची श्री धावीर देवस्थान ट्रस्टवर पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे आणि यशस्वी शिष्टाईमुळे हा गुंता सुटला असून, यामुळे मंदिर ट्रस्ट आणि भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आह गेल्या अनेक वर्षांपासून फिरोज टॉकीज ते श्री धावीर मंदिर या सुमारे ७०० मीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम रखडले होते. या मागणीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच ४० लाख रुपये खर्च करून करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामाचे लोकार्पणही करण्यात आले. हा रस्ता केवळ गौलवाडी गावाला जोडणारा मुख्य मार्ग नसून, श्री धावीर महाराजांच्या पालखी मार्गाचा महत्त्वाचा भाग असल्याने त्याला धार्मिक व सामाजिक दृष्ट्या व...
www.news24taasmarathi.com पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... www.news24taasmarathi.com
Popular posts from this blog
रोह्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर कोळी बांधवांनी सुरू केलेला गाझी शेख सलाऊद्दीनशा बाबांचा उर्स मंगळवारपासून उत्साहात रोहा (संदीप सरफळे) :- रायगड जिल्ह्यातील सामाजिक सलोख्याचे आणि श्रद्धास्थानाचे केंद्र असलेल्या रोहा शहरातील हजरत गाझी शेख सलाऊद्दीनशा बाबांचा उर्स यावर्षी मंगळवारपासून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या उर्स सोहळ्यासाठी केवळ रोहा शहरच नव्हे, तर मुंबई, पुणे आणि संपूर्ण राज्यभरातून भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून दर्गा परिसर भक्तीने न्हाऊन निघाला आहे. या उत्सवाचा ऐतिहासिक वारसा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात रेवदंडा येथील कोळी बांधव आपल्या मचव्यांतून व्यापारासाठी रोहा बंदरात येत असत. त्या काळात त्यांना या जागृत देवस्थानाची प्रचिती आल्याने, १९०९ साली रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी रेवदंड्याच्या कोळी बांधवांनी पुढाकार घेऊन हा पहिला उर्स साजरा केला होता. कोळी बांधवांनी सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि अखंडपणे सुरू असून, सर्व धर्माचे नागरिक या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होतात. उर्साच्...

Comments
Post a Comment