महाराष्ट्र पोलीस कमकुवत नाहीत तर ते कर्तव्यदक्ष आहेत; फक्त राजकीय दबाव थांबला पाहिजे - किशोर जैन 

तोंड बंद आंदोलनात केले प्रतिपादन

नागोठणे (महेंद्र माने) :- बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर शाळेतील विद्यार्थींनी आणि विद्यार्थी विशेष मुलींच्या  सुरक्षेचा प्रश्नाबाबत सर्वांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.परंतु बंद करू नका हा हायकोर्टच्या आदेशाचा मान राखून येथील सर्व आघाडीचे कार्यकर्त्यांनी शिवसेना रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांच्या नेतृत्वाखाली शनिवार 24 ऑगस्ट रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तोंड बंद आंदोलनात मुकपणे राहून हाताला काळया फिती लावून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी  महाराष्ट्र पोलिस कधीही कमकुवत नाहीत तर ते कर्तव्यदक्ष आहेत; फक्त राजकीय दबाव थांबला पाहिजे असे प्रतिपादन किशोर जैन यांनी केले.

आजचा पुकारलेला बंद पूर्ण यशस्वी करण्याची तयारी झाली होती. परंतु कोर्टच्या बंद न करण्याच्या आदेशाचा मान राखून आज बंद न करता तोंड बंद आंदोलनात काळ्या फिटी लावून निषेध व्यक्त करत आहोत. राज्यात अशा अनेक घटना घडल्या असून त्यात रोज वाढ होत आहे. प्रशासनाची कारवाई करण्याची इच्छा असते; महाराष्ट्र पोलिस हे कधीही कमकुवत नव्हते ते अतिशय कर्तव्य दक्ष असतात. परंतु राजकीय दबावा पोटी त्यांच्यात कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या प्रमाणे गुन्हा दाखल होण्याची व निर्दोष सोडण्याची पद्धत आली आहे.असे कधी होत नव्हतं त्यांना काम करण्याची पूर्ण मुभा असायची.त्या मध्ये हस्तक्षेप होत गेली. त्यामुळे अन्याय अत्याचार वाढलेला असून बदलापूर घटनेतही तसेच झाले असून त्याचा उडालेला भडका राज्यात गेला आहे. तसेच राज्यात रोजचं अशा घटना घडत असून त्याचा प्रशासना मार्फत कुणाचाही हस्तक्षेप न होता बदोबस्त व्हावा यासाठी हा बंद पुकारला होता. परंतु कोर्टाने बंद न करण्याचा दिलेल्या आदेशाचा सन्मान राखून आजचा  बंद थांबविला असल्याचे सांगून आघाडीत ठरल्याप्रमाणे आज चौकात मुक राहत हाताला काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करीत असल्याचे शेवटी किशोर जैन यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटीका दर्शना जवके, उपसरपंच अखलाख पानसरे, शिवसेना विभाग प्रमुख संजय भोसले, शहर कॉग्रेस अध्यक्ष अशपाक पानसरे, शाखाप्रमुख धनंजय जगताप, ग्रा. पं. सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, प्रकाश कांबळे व संतोष  नागोठणेकर, ग्रा. पं. सदस्या अमृता महाडिक, ज्योती राऊत, भाविका गिजे व शहनाज अधिकारी यांच्यासह मोहन नागोठणेकर, बाळु रटाटे, प्रशांत भोईर, प्रणिता पत्की, इम्रान पानसरे, समीर भिकन, गुडु पानसरे, हुसेन पठाण, जितेंद्र जाधव, ऋत्विज माने, जुऐब कुरेशी, इक्बाल पानसरे, बालम मुजावर, नजिर सय्यद, भरत गिजे,दामोदर नागोठणेकर, पुरूषोत्तम घाग, सुरेश कांबळे, रूपेश जगताप आदींसह आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog