धाटाव एमआयडीसी परिसरातील बंद कारखान्यात केमिकल कचऱ्याची अनधिकृत विल्हेवाट! राजकीय वरदहस्तामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर रोहा-रायगड, दि. १६ (किरण मोरे) :- रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) प्रदूषण आणि बेकायदेशीर कृत्यांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला असून, यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला आहे. सध्या या भागातून एक अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर येत आहे. धाटाव एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या नामांकित एक्सल कंपनीच्या अगदी समोर एक जुना कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत पडलेला आहे. याच बंद कारखान्याच्या आवाराचा आणि केप्रेस कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या रिकाम्या जागेचा गैरफायदा काही समाजकंटकांकडून घेतला जात आहे. आसपासच्या कार्यरत कंपन्यांमधून निघणारा अत्यंत घातक आणि रासायनिक (केमिकल) कचरा कोणतीही पूर्वपरवानगी न घेता किंवा नियमांचे पालन न करता या बंद कारखान्याच्या परिसरात बेकायदेशीरपणे आणून टाकला जात आहे. व्हिडीयो पहा केवळ हा रासायनिक कचरा ये...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
पनवेल महानगरपालिकेला क्रांतिवीरांचा विसर; अदई सर्कलवरील क्रिकेट थिममुळे नागरिक आक्रमक "इतिहास पुसण्याचा प्रयत्न थांबवा" - छावा क्रांतिवीर सेनेचा मनपाला इशारा! पनवेल-रायगड, दि. २० (सुरेश तांडेल) :- येथील 'अदई सर्कल'ला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे नाव देण्यात आलेले असताना, पनवेल महानगरपालिकेने त्या ठिकाणी चक्क 'क्रिकेट थीम' उभारली आहे. मनपाच्या या भूमिकेमुळे स्थानिक नागरिक आणि क्रांतिवीरप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. येथील क्रिकेट थीम तात्काळ हटवून त्या ठिकाणी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्यात यावे, अशी अधिकृत मागणी १९ मे २०२६ रोजी 'छावा क्रांतिवीर सेने'ने पनवेल महानगरपालिकेकडे पत्राद्वारे केली आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हे भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध सशस्त्र लढा उभारणारे ते पहिले महान क्रांतिकारक होते. रायगड जिल्ह्यातील शिरढोण हे त्यांचे जन्मगाव. इंग्रज सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात त्यांनी ...

Comments
Post a Comment