आंबेवाडी ते निवी कालव्याला भगदाड

२८ कोटींच्या कॉंक्रीटीकरण कामाची लोकार्पण करण्यापूर्वीच वाताहत

१४ वर्षे दुबार पीक घेण्यापासून शेतकरी वंचित

रोहा (प्रतिनिधी) :- रोह्याच्या कुंडलिका नदीच्या सिंचनातून ५५ वर्षे जुन्या असलेल्या कालव्यावर काँक्रिटीकरणासाठी १०१२ पासून आज पर्यंत सुमारे २८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र नियोजनाच्या अभावामुळे आज तेरा वर्षे झाली तरी पाटबंधारे विभागाला या कालव्यातून पाणी सोडता आलेले नाही. अशातच आंबेवाडी ते निवी कालव्याला लांडर गावाजवळ मोठी भगदाडं पडली आहेत. ही भगदाडं गेली वर्ष-दीड वर्ष आहे त्याच स्थितीत आहेत.

आंबेवाडी ते निवीदरम्यान कालव्याचे काँक्रीट अस्तरीकरण बऱ्याच ठिकाणी उघडले आहे. लांडर गावाजवळ कालव्याला पडलेली भगदाडं पाटबंधारे विभागाला दिसत नाहीत. कालव्याचा पाणी सोडले जात नसताना देखील दरवर्षी कालवा साफसफाई लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र एखादा शेतकरी किंवा सार्वजनिक कामासाठी ग्रामपंचायतीने कालव्याच्या बाजूला जरा जरी खोदले, तर हेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी साइटवर येऊन दमदाटी करतात आणि कायद्याची भाषा वापरतात. कोलाड पाटबंधारे विभाग बांधकाम व्यावसायिकांना पुररेषेतील परवानगी देण्यात व्यस्त आहेत. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला पाटबंधारे विभागाला वेळ नाही. त्यांनी कालव्याची ही भगदाडं आधी दुरुस्त करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Popular posts from this blog