बकरी ईदच्या अनुषंगाने न्यायनिर्देश व कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक संपन्न
रायगड (प्रतिनिधी) :- बकरी ईद दरम्यान कालावधीत उच्च न्यायालयाकडील ५ जुलै २०२२ च्या न्यायनिर्देश व महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा २०१५ प्राणी क्लेश कायदा १९६० वाहतूक नियम मधील तरतुदीचे पालन करणे गरजेचे आहे. या कालावधीत जिल्ह्यात या नियमांची अंमलबजावणी करून सुव्यवस्था राखण्याच्या सुचना जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठकीत देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय गयगड येथील राजस्व सभागृहात आयोजित बकरी ईदच्या अनुषंगाने जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. बैठकीस नवी मुंबई पोलीस उपयुक्त ए एल राजपूत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बी ए माळवे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तथा सदस्य सचिव प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती डॉ. सचिन देशपांडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा १९७६ (सुधारणा १९९५) तसेच प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा १९६० अन्वये अंमलबजावणी करण्याकरिता अधिनियमातील तरतुदी बाबत माहिती दिली. रायगड जिल्ह्यामध्ये बकरी ईद निमिताने काही प्रमाणावर कुर्बानीसाठी जनावरांची वाहतूक होत असते. वाहतुकीचे नियम मोडून प्राण्यांची वाहतूक होण्याची शक्यता असलेने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत तपासणी नाक्यावर पशुवैद्यकीय अधिकातऱ्याची नेमणूकः केल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी सागितले.
राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ लागू असून ४ मार्च, २०१५ पासून सुधारीत अधिनियमांप्रमाणे गायींची, वळूची व बैलाची कत्तल करण्यास मनाई आहे. तसेच सदर अधिनियमातील नियम ५ अन्वये गाय, वळू व बैल या प्राण्यांची कत्तल, कत्तलीसाठी वाहतुक, कत्तलीसाठी निर्यात, कत्तलीकरीता खरेदी-विक्री, कत्तलीकरीता विल्हेवाट करण्यास मनाई आहे. केंद्र शासनाच्या Prevention of Cruelty to Animals (Slaughterhouse) Rules, २००१ मधील नियम ३ अन्वये गर्भधारणा केलेले पशु, ३ महिन्यांपेक्षा कमी वयाचे पशु, सक्षम अधिकाऱ्यांने कत्तलयोग्य असे प्रमाणिकरण न केलेले पशु यांच्या कत्तलीस प्रतिबंध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील तळोजे, पनवेल, खोपोली, कर्जत तालुक्यातील दामद, ममदापूर व माळोख येथे नियमीतपणे यापूर्वी मुस्लिम बांधव कुर्वानीसाठी तात्पुरत्या कुर्बानी केंद्रासाठी परवानगी मागणीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कृतिका आरमळे, डॉ. रत्नाकर काळे, डॉ. गौतम भ, डॉ मारकवर यासह पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, पोलीस, आरटीओ आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.