खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वावेखार शेकाप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश 

खासदार सुनील तटकरे यांना वाढदिवशी अनोखी भेट 

कोलाड : प्रतिनिधी

सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणात खूप मोठ्या अशा घडामोडी घडत असून त्याचे पडसाद आता स्थानिक राजकारणात उमटू लागले असल्याचे दिसून येत आहे रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार सुनील तटकरे यांनी सेना-भाजप युतीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याने पुन्हा आदिती ताई तटकरे  यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली तोच रायगडच्या राजकारणात उलथापालथी घडत आहेत रोहा तालुक्यातील गेली अनेक वर्ष निष्ठेने शेतकरी कामगार पक्षात राहणाऱ्या वावे खार ग्रामस्थांनी रायगडच्या राजकारणात किंग मेकर ठरणाऱ्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील जी तटकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेत  त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वावे खार ग्रामस्थांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला.

वावेखार गावचे माजी सरपंच भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला  तर त्यांचे युवा आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी पक्षात जाहीर स्वागत करीत या गावच्या विकासाच्या समस्या मार्गी लावल्या जातिल गावच्या कार्यकर्त्यांना निश्चित अशी ताकद देणार असल्याचे अनिकेत तटकरे म्हणाले.

रायगड जिल्हा आणि शेतकरी कामगार पक्ष हे समीकरण गेल्या अनेक वर्षाचे होते शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात मोठा इतिहास आहे मात्र अनेक वर्षाचा हा शेतकरी कामगार पक्ष पुढे भरारी न घेता दिवसेंदिवस मागे पडला रायगड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती शेतकरी कामगार पक्षाच्या होत्या मात्र त्या ग्रामपंचायती इतर पक्षात प्रामुख्याने राष्ट्रवादी पक्षात गेल्या अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्ष आपल्या पक्षाचा गाडा हाकत असताना कुठेतरी निर्णय क्षमता कमी पडल्याने एके काळचा शेतकऱ्यांसाठी लढणारा शेतकरी कामगार पक्ष राजकीय स्पर्धेत कमी पडला काहीच महिन्यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार धैर्यशील दादा  पाटील यांनी भारतीय जनता पार्टी जाहीर  प्रवेश केला आता कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाचा आधार घेत शेकापला सोडचिठी देत आहेत कार्यकर्त्यांना सत्ता हवी, काम करणारी नेते हवेत, गावचा विकास हवाय, अनिकेत भाई आदिती ताई सारखे युवा नेतृत्व हवय  ते सर्व राष्ट्रवादी पक्षात असल्याने अलिबाग सारख्या मतदारसंघातून देखील वावे खार ग्रामस्थांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला वावेखार येथील संपूर्ण  शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने शेतकरी कामगार पक्षाची ताकद स्वतःच्या होम ग्राउंड वर कमी होताना दिसत आहे.

महाविकास आघाडीतून सुनील तटकरे बाहेर पडल्याने शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी भाजपा बरोबर आम्ही कधीच जाणार नसून शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी ठाम राहणार असुन रायगड मधून त्यांना ताकद देणार असे जाहीर करत खासदार सुनील तटकरे बरोबर फारकत घेतली त्यानंतर रायगडात मोठ्या प्रमाणात शेकापला सुरुंग लागत असल्याचे वावेखार  ग्रामस्थांच्या पक्षप्रवेशावरून दिसून येत असून आगामी काळात शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्त मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील असे राष्ट्रवादी पक्षाच्या  गोटातून सांगण्यात येत आहे. माजी सरपंच भारत कृष्णा पाटील काशिनाथ घाणेकर सुरेंद्र घाणेकर राजू खरीवले जगदीश घाणेकर संतोष नमद रे मनोज म्हात्रे दयाराम ठाकूर रामा वाडकर नामदेव वाडकर मंगेश घाणेकर उपकार घाणेकर रमेश ठाकूर रमेश दामोदर ठाकूर मिथुन काटकर रुपेश ठाकूर ऋतिक सालस्कर सुरज वाडकर सुनील ठाकूर दिलीप ठाकूर वसंत पाटील काशिनाथ धुमाळ नथुराम धुमाल वसंत धुमाल वसंत घाणेकर प्रदीप घाणेकर वासुदेव पाटील भास्कर पाटील रवींद्र घाणेकर केशवनाथ घाणेकर पांडुरंग दामोदर घाणेकर पांडुरंग  ठाकूर जनार्दन चांगु ठाकूर दिनेश ठाकूर पांडुरंग रामभाऊ ठाकूर अधिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी पश्चिम खोऱ्यातील  युवा नेते संतोष भोईर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले समवेत युवा कार्यकर्ते मयूर खैरे व योगेश ठाकूर व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित होते

Popular posts from this blog