वरसे ग्रामपंचायतीचे कचरा व्यवस्थापनाचे नियोजन चुकले! 

चुकीच्या ठिकाणी कचरा टाकण्यात आल्यामुळे भातशेतीचे नुकसान झाल्याची तक्रार

रोहा : प्रतिनिधी

वरसे ग्रामपंचायतीचे कचरा व्यवस्थापनाचे नियोजन चुकल्याचे निदर्शनास आलेले असून ग्रामसेवक अशोक गुटे यांच्या सांगण्यावरून ग्रामपंचायतीतर्फे चुकीच्या ठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्यामुळे भातशेतीचे नुकसान झाल्याची तक्रार संतोष यशवंत पाटील यांनी जिल्हाधिकारी रायगड, तहसिलदार रोहा, वनविभाग रोहा तसेच अन्य संबंधित कार्यालयांकडे दाखल केलेली आहे. 

याप्रकरणी संतोष पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सर्व्हे नं.६७/१ब/१ ही जमीन मिळकत ही मनिषा सुभाष राजे यांच्या नांवे असून सर्व्हे नं.६७/१ब/१ चे इतर हिस्सेसुध्दा आहेत. ग्रामपंचायत मार्फत सर्व्हे नं.६७/१ब/१ व इतर हिस्से यांमध्ये मागील ५ वर्षांपासून कचरा टाकण्यात येत आहे. सदरच्या मिळकतीत श्री. सुभाष राजे यांच्या मार्फत दगड खाण काम चालू असायचे. दगड खाणीचे काम दगड काढण्यात आलेले आहे व त्या दगडखाणीत (कॉरी) मध्ये ग्रामपंचायत मार्फत गेली पाच वर्षे कचरा टाकत आहेत. ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रार करून सुध्दा याची दखल घेण्यांत आली नाही. त्या खाणीमध्ये कचरा टाकत आहेत. त्या मिळकतीस वन तरतूदी लागू आहेत. सदरच्या घाणीचे डंपीग ग्राऊंड करण्यांत आले आहे. कोणतेही शासनाची परवानगी न घेता सदरच्या मिळकतीला लागून संतोष पाटील यांची जमीन मिळकत असून सर्व्हे नं.५१/२/अ (सामाईक मिळकत) मागील पाच वर्षापासून ग्रामपंचायतकडून खाणीत ग्रामसेवक यांचे सांगणेवरून मिळकतीलगत असलेल्या मिळकतीमध्ये कचरा नित्याने टाकत आहेत. त्यामुळे त्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे. त्यांच्या शेत जमीनीच्या शेजारी धारकाची दगडाची खाण ही डोंगराळ भागात असल्याने कचऱ्याचे, दुर्गंधी युक्त घाणपाणी शेतात येत आहे. त्यामुळे गंभीर आजारपणाला सुध्दा सामोरे गेलेलो आहोत असे त्यांनी आपल्या तक्रारींत नमूद केलेले आहे. वारंवार सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना सांगून सुध्दा कोणतेही कचऱ्याचे नियोजन ग्रामपंयायतीने केलेले नाही. या जमीनीलगत सर्व्हे नं.५० मध्ये प्राचिन श्री. भूवनेश्वराचे मंदीर आहे. त्याशेजारी तलाव आहे, त्या तलावातसुध्दा कचऱ्याचे घाण पाणी साठत आहे व भूवनेश्वर च्या पिंडीच्या गाभाऱ्यात सुध्दा पावसाळ्यामध्ये दुर्गंधी असलेले घाण पाणी येत आहे. ग्रामपंचायतीकडून ग्रामसेवक श्री. अशोक गुटे यांच्या सांगण्यावरून खाणीमध्ये टेम्पोद्वारे कचरा टाकला जातो. नियोजन शुन्य ग्रामपंयायत टाकत असलेल्या कचऱ्यामुळे शेती नापिक झाली आहे त्यामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून नुकसान भरपाई मिळावी. कचरा टाकत असलेली मिळकत ही वन तरतुदी अधीन केंद्र शासनाच्या पुर्व परवानगी शिवाय वनेत्तर कामास बंदी आहे असा शेरा आहे. तरी सुध्दा कोणत्याही प्रकारे वन खात्याच्या परवानगी न घेता कचरा टाकण्यात आहे. कोणतीही परवानगी न घेता पर्यावरणाचा नाश करण्यात येत आहे. 

वरील प्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधीतांवर कार्यवाही करण्यात यावी. सदरच्या खाणीमध्ये ग्रामपंचायत मार्फत घनकचरा विघटन प्रकल्प बसवण्यात येणार आहे, त्याला आमची हरकत आहे. सदरची मिळकत ही रहीवासी विभागात येत असून नागरी वसाहतीच्या जवळ आहे, त्यामुळे धूर प्रदूषण होणार आहे. नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, शिवाय कचरा ठेवण्यासाठी डंपीग ग्राऊंड हे नियोजन नसुन सदरचा प्रकल्प राबवत आहेत त्याबद्दल हरकत घेण्यात आली असून वरसे ग्रुपग्रामपंचायत मध्ये वरसे गट नं. ६९ व २६ हे ७/१२ सरकारी आहेत क्षेत्र ७९ गुंठे व ३२ गुंठे आहेत. नागरी वसाहतीपासून लांब व पोहच मार्ग आहे. त्यामध्ये प्रकल्प राबवण्यास कोणतीही हानी व नुकसान नसुन मिळकत सरकारी आहेत, रितसर मागणी करून शासनाकडून घेऊन प्रकल्प करता येऊ शकतो. 

ग्रामपंचायतीस मागणी करण्यात रस नाही. गट नं. २६ वर तर अतिक्रमणे आहेत, तेही ग्रामपंचायतीने तिथे ३२ गुंठे जमीन आहे, त्यात स्मशानभूमि बांधण्यात आली आहे. गट नं. ६९ पुर्ण मोकळी जागा आहे, त्या मिळकतीमध्ये प्रकल्प (धनकचरा निवारण) शेड बांधण्यास उपयुक्त जागा असून नागरी वस्तीपासुन लांब आहे. तरी याप्रकरणी झालेल्या माझ्या नुकसानीची रितसर चौकशी करून ग्रामपंचायतकडून भरपाई मिळावी व दोषींवर कडक कार्यवाही करण्यांत यावी अशी तक्रार संतोष यशवंत पाटील यांनी शासनाकडे दाखल केलेली आहे.

Popular posts from this blog