बौध्द लेण्या इंग्रजांनी शोधून काढल्या, इथल्या व्यवस्थेने त्या विध्वंस केल्या असत्या - भिमराव आंबेडकर
साई/माणगांव : हरेश मोरे
जगामध्ये सम्राट अशोकाने ८४ हजार स्तुप व लेण्या उभारल्या त्याच शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असून हा इतिहास शोधण्याचा देखील प्रयत्न आपण केला आणी त्या मध्ये यशस्वी झालो.भारतातील बौध्द लेण्याचा इतिहास हा इंग्रज अधिकारी यांनी लिहीलेला असून त्यांनी या लेण्या शोधून काढल्या आहेत,नाहीतर येथील व्यवस्थेने त्या गडब व विध्वंस करण्याचा व संपवण्याचा प्रयत्न होता. अशा त्या इंग्रजाचे देखील आभार मानायला हवे त्यांनी हे १८ व्या शतकात सर्व शोधून काढले आणि आपल्या गँजेट मध्ये त्यांनी नोंद केली आहे. जगामध्ये अंधकार हा शिक्षणाच्या बाबतीत होता त्या वेळी भारत देशामध्ये १९ विद्यापिठे होती.मग ती नांलदा,तक्षशिला असतील.चद्रगुप्त मौर्या आले आणि त्यांनी १२ शे वर्षे राज्य या देशावर केले आहे तो एक सुवर्ण काळ होता.परंतु ज्यानी काहीच निर्माण केले नाही त्यांनी फक्त कब्जा केला.तसेच या देशामध्ये तिन समुदाय आहेत त्या तीन धर्माचे प्रमुख आहेत त्यानी या देशाला भरभरून दिले आहे.असे भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांनी शनिवार दि.१० सप्टेंबर २०२२ रोजी तळा तालुक्यात कुडा बौद्ध लेणी नामफलकाच्या अनावरण या कार्यक्रमात त्यांनी बोलताना सांगितले.
यावेळी भिमराव आंबेडकर यांचे तळा शहरात आगमन होताच खालूबाज्या तसेच लेझिमच्या ठेक्यात तसेच समता सैनिकांनी दलाने सलामि देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच तळा नगरपंचायती मध्ये देखील नगराध्यक्ष भोरावकर ताई,चंद्रकांत रोडे, तसेच नगरसेवक यांनी भिमराव आंबेडकर यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत केले,यावेळी त्याच्या समवेत भिखु संघ तसेच लेणी सर्वधन युनिट चे पदाधिकारी,भारतीय बौध्दमहासभेचे राष्ट्रीय महासचिव जगदिश गवई, महाराष्ट्राचे अध्यक्ष भिकाजी कांबळे,चिटणीस सुशिल वाघमारे,रायगड दक्षिण जिल्हा भारतीय बौध्दमहासभा अध्यक्ष अनिल मोरे, सरचिटणीस संतोष जाधव,कोषाध्यक्ष विजय जाधव,संस्कार उपाध्यक्ष अशोक काटे,मनोहर जाधव, संजय सोनावणे, नितिन मोरे, बाबा कांबळे, गायक भिमराज सुर्यतंन,प्रदिप मोहिते, महिला उपाध्यक्षा व सचिवा मिराताई सुरळकर,गीताताई कांबळे,अस्मिता जाधव,सुभाष ओव्हाळ,माणगाःव ता.अध्यक्ष प्रबुध्द जाधव, सचिव कमलाकर गंगावणे,गौतम वाघमारे ,वैशाली जाधव, श्रीवर्धन प्रदिप मोहिते,संदिप जाधव, म्हसळा सुरेश जाधव ,सुभाष साळवे,तळा तालुका अध्यक्ष भिमराव जाधव,सचिव प्रकाश गायकवाड, रोहा सुर्याकांत कांबळे,वसंत गायकवाड, पोलादपुर संतोष मोरे,संदिप साळवी,महाड विश्वनाथ सोनावणे,भिमराव कांबळे तसेच उपासक उपासिका यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.
तसेच भिमराव आंबेडकर यांची तळा बाजारपेठेतून वाजत गाजत मिरवणूक काढून तळा चौकात भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आले. यावेळी तळा तालुका बौध्दजन पंचायतीचे समितीचे अध्यक्ष अनंत मोरे,किशोर मोरे,सामाजीक कार्यकर्ते व उद्योजक रामदास मोरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक धनराज गायकवाड,लक्षण गायकवाड,चितांमण नाक्ते,लक्षण संकपाळ,पांडूरंग गव्हाणे,लक्षण तांबे,यांनी पुश्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.
पुढे भिमराव आंबेडकर यांनी बोलताना सांगितले की या बुध्द लेण्या स्मारके यांना वर्ल्ड हेरिटेज मध्ये कशा जातील तसेच त्यांना जागतिक दर्जा कसा भेटेल याचा आपण प्रयत्न कारूया देशभरातील लेण्यावर स्तुपावर आपल्या बौध्द संघटनेचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे मग ती बौध्दाची कोणतीही संघटना असो कार्यक्रम सतत झाल्यामुळे लेण्यानवर घुसखोरी बंद होईल विध्वंस्ता होणार नाही.हाच संदेश मी ५ आक्टोबर २०२२ रोजी धम्म चक्र परिवर्तन दिनी नागपूर दिक्षा भुमितुन तमाम बौध्दाना देणार आहे.तसेच तळा येथील कुडा बौध्द लेणी हा धम्माचा वारसा जागतिक स्तरावर जावा याची आर्चलाँजीक महाराष्ट्र दिल्ली मध्ये नोंद व्हावी जेने करून जगभरातील पर्यटक येतील आणि एक उत्पनाचे साधन निर्माण होईल ज्या प्रमाणे औरंगाबाद येथील वेरूळ अंजठा लेणीवर लाखोच्या संख्येने पर्यटक येतात व उत्पन्न होते.