नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या हेटवणा पाईपलाईनला धोका

खारपाडा जवळील पाताळगंगा नदीवरील हेटवणा पाईपलाईन असलेल्या लोखंडी पुलाची दुरवस्था 

खारपाडा : सुरेश तांडेल

नवी मुंबई ला पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोने हेटवणा धरण बांधून त्या धरणाचे पाणी पाईपलाईनच्या साह्याने नवी मुंबई व पाईप लाईन शेजारी असलेल्या गावांना पाणी पुरवठा होत आहे.

पाताळगंगा नदीवरील पूल हा 1999 साली बांधण्यात आला. या पुलासाठी लोखंड निकृष्ट दर्जाचे वापरल्यामुळे हा पूल मुदतीपूर्वी गंज पकडून खराब झाला. शिवाय या पुलाची डागदुजी व रंगरंगोटी बरेच वर्ष करण्यात आली नाही आणि कोरोना काळापासून या पुलाची पाहणी करण्यासाठी कोणीही अधिकारी फिरकला नाही. "WORK FROM HOME"  यामुळे या पुलाची पाहणी घरातून करण्यात आली. त्यामुळे खोटा (चुकीचा) अहवाल सादर करण्यात आला. या करणामुळे या पुलाची आज ही दुरवस्था झाली आहे. 

याला जबाबदार कोण? शासन, सिडको प्रशासन की कर्मचारी हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे .या पुलाचे 17 लोखंडी कॉलम गंज लागून खराब झाले आहेत. ते केव्हा पण नदीत पडू शकतात. या करणामुळे या पुलावर असलेली हेटवणा पाईपलाईन तुटून नदीत पडेल आणि नवी मुंबईला आणि शेजारील गावांना पाणी पुरवठा केव्हाही बंद होऊ शकतो. शिवाय या पुलाची डागडुजी करण्याची मागणी कासारभट, खारपाडा, कर्नाळी नाका आणि डोलघर या गावातील नागरिक करत आहेत. जर या पुलाची डागदुजी लवकरात लवकर नाही केली तर आवाज उठवला जाईल. याला सर्वस्वी जवाबदार सरकारी प्रशासन व्यवस्था राहिल याचे संबंधित प्रशासनाने दखल घेवुन योग्य तो निर्णय लवकारात लवकर घ्यावा अशी मागणी समस्त गावातील नागरिक करीत आहेत.

Popular posts from this blog