वैशाली नगर तळाघर बौद्धवाडी येथे पाणीप्रश्न बनलाय गंभीर, शासनाचे दुर्लक्ष!

रोहा : किरण मोरे 

वैशाली नगर तळाघर बौद्धवाडी येथे पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असताना देखील त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने येथे घोटभर पाण्यासाठी नागरिकांची दमछाक होत असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी वैशाली नगर तळाघर बौद्धवाडी यांनी तहसील कार्यालय येथे पाण्यासारख्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याबाबत रोहा एस.टी.स्टॅंड पासून तहसील कार्यालयावर शांतीपूर्वक मोर्चा काढून जनता दल सेक्युलर मार्फत व इतर सामाजिक संघटना यांनी घोटभर पाण्यासाठी संघर्ष मोर्चा काढला होता. 

परंतु प्रशासनाकडून अद्याप वैशाली नगर तळाघर बौद्धवाडी यांच्या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच रोहा तहसीलदार व संबंधित अधिकारी यांना वारंवार भेटून देखील त्यांनी फक्त आश्वासनेच दिली असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तरी तातडीने येथील पाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.

Popular posts from this blog