मराठी भाषेच्या संवर्धनासाठी संत व साहित्यिकांचे मोठे योगदान - रमेश धनावडे

नागोठणे : महेंद्र माने 

रायगड जिल्हा मराठी भाषा संवर्धन समिती,नवजीवन विद्यामंदिर व कै.द.ग. तटकरे ज्यु.कॉलेज,इंदापूर तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, तळा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवी कुसुमाग्रज यांची जयंती साजरी चंद्रशेखर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व कवी, गीतकार, लेखक, तथा रिलायन्स कंपनी नागोठणेचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी  कोमसाप तळा शाखेचे अध्यक्ष हेमंत बारटक्के, कोमसाप जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र म्हात्रे, सौ.पूनम धनावडे, प्रभारी मुख्याध्यापक गावडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व इतर पदाधिकारी उपस्थितीत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन व सरस्वतीपूजन तसेच विद्यालयाचे संगीत शिक्षक अजित भोपी व विद्यार्थ्यांनी सुस्वर ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.त्यानंतर हेमंत बारटक्के व जितेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते रमेश धनावडे यांचा कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

रमेश धनावडे यांनी आपल्या व्याख्यानात मराठी भाषेचा इतिहास सांगुन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी संत व साहित्यिकांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले.तसेच कवी कुसुमाग्रज यांच्या काव्य व साहित्याचा परामर्श घेऊन स्वतःच्या विनोदी कविता, मार्मिक चारोळ्या सादर करुन उपस्थित रसिकांची मने जिंकली. चंद्रशेखर देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकेत मराठी भाषेचे महत्त्व सांगून पाहुण्यांचे स्वागत केले. हेमंत बारटक्के यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषा ही साधी सरळ असून आपल्या थोर साहित्यिकांनी साध्या शब्दातच अनेक गोष्टीचे वर्णन आपल्या साहित्यातून प्रभावीपणे केले असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांना पुस्तक भेट देण्यात आली. या कविसंमेलनात भरत जोशी, उल्का माडेकर, प्रणय इंगळे यांनी काव्य तर नागेश नायडू यांनी बहारदार गझल सादर केले. तसेच विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांनी महामहिम राष्ट्रपतींना लिहिलेली पत्रे पोस्ट कर्मचारी मधुकर राशिनकर यांचेकडे सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा.शब्बीर हज्जू यांनी केले.

Popular posts from this blog