रोज मागवावे लागतात पाण्याचे टँकर; अपरिपक्व नेतृत्वामुळे शहराचा विकास खुंटला!
तळा (संजय रिकामे) : तळा शहरात गेल्या २५ वर्षांपासून नेतृत्व करणारे परिपक्व नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे! केवळ भावनिक राजकारण करून लोकांची दिशाभूल केली जाते आहे.तळा शहरात गेल्या २५ वर्षांपासून नेतृत्व करणारे परिपक्व नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे. केवळ भावनिक राजकारण करून लोकांची दिशाभूल केली जाते आहे. आपणही त्याला भुलून मतदान करत आहोत, लगतची शहरे विकसित होत असताना तळा शहर मागे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नसल्याने नागरकरांनी वेळीच निर्णय घ्यावा, असे मत आता सर्व सामान्य वर्गातून व्यक्त केले जात आहे. तळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर होऊन आज पाच वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र नगरपंचायत प्रशासनाच्या नियोजन शुन्यतेमुळे तळा शहराचा विकास पुर्णतः खुंटला आहे. शहरात पाण्याची टंचाई एवढी भिषण आहे की, नागरिकांना रोज पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. पाणी नियोजनाची जबाबदारी असलेल्या यंत्रणांमधील बेफिकिरी, समन्वयाचा अभाव, नियोजनाची टंचाई आणि पाण्याच्या पर्याय शोधाकडील दुर्लक्ष केल्याचे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. ग्रामीण भागातील खेडेगाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेली असुन पाणीपुरवठा गाव कमेटी मार्फत चोवीस तास पाण्याची सुविधा ते सुध्दा पाणी शुद्धिकरणाचे यंत्र लाऊन फील्टर पाण्याची सुविधा गावांना करण्यात आलेली आहे. खेडेगावं पाणी पुरवठा बाबतीत स्वयंपूर्ण झालेले असुन तळा शहर मात्र नियोजनाच्या अभावी समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. उलट भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोणतेही धोरण स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेले नाही. वावे धरणातून तळा शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे, परंतु मंजूर झालेल्या कामांचे केवळ बॅनर लावण्यातच धन्यता मानण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. योजनेचे काम अजुुुन सुरु झालेेेले नाही.
सध्या सुरु असलेेेली पाणी पुरवठा योजनेत सतत बिघाड होत असतो, हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी आज किती खर्च केला जातोय याबाबत आता सर्व सामान्यांकडुन शंका उपस्थित केली जात आहे. पाणी पुरवठा समस््ये संदर्भात तळा तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की, तळा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कुचकामी आहे, मी जीथे राहतोय त्या ठिकाणी दर दिवशी नागरिकांना टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. प्रशासनाकडुुन नियोजनाच्या टंचाईचा विळखा कायम आहे.यात सुुधारणा न झाल्यास तळा तालुका भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे यांनी दिला आहे.