लॉकडाऊनच्या तरतुदी संदर्भात रोह्यातील नागरिक व व्यापारी संभ्रमात! 

रोहा (रविना मालुसरे) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक १५ एप्रिल पासून पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये काय सुरू व काय बंद असणार याची सूची राज्य शासनाने जाहीर केलेली आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा व सार्वजनिक वाहतूक सेवाही सुरू राहणार आहे. तसेच खाद्यपदार्थ, फळे, भाजीपाला, डेअरी, बेकरी, बँका व काही कार्यालये सुरू राहणार आहेत. कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी एक तर फक्त मेडिकल स्टोअर्स व  दवाखाने सुरू ठेऊन बाकी सर्व बंद करावे त्याच बरोबर वाहतूकही बंद करावी. तसे शक्य नसेल तर सर्वकाही पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावे अशी मागणी आता नागरिक व व्यापारी वर्गातून होत आहे. कारण ठराविक दुकाने उघडी राहिल्यामुळे बाजारपेठा पुन्हा फुलतात व लॉकडाउनच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो. या नवीन लॉकडाऊनच्या तरतुदीनुसार जवळपास अर्धी बाजारपेठ उघडी राहणार आहे, असे वाटत असल्यामुळे मग खरेच हा लॉकडाउन यशस्वी होईल का? याबाबत रोहेकर नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Popular posts from this blog