श्रीराम मंदिर निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदेच्या बैठकांचे आयोजन, माणगांव प्रखंडाची बैठक संपन्न 

माणगांव (राजन पाटील) : देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी नेहमी कटीबद्ध राहून विविध जाती, पंथ व सांप्रदायात विभागलेल्या हिंदू समाजाला संघटीत करून सेवा, संस्कार व सुरक्षा या त्रिसूत्रीतून १९६४ साली स्थापन झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या ४५२ वर्षांच्या अथक व अविरत संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार  आयोध्येतील श्रीरामाच्या मंदिर बांधणीसाठी परवानगी मिळाल्यावर संपूर्ण जगभरातील श्रीराम भक्तांना आनंद झाला. 

संघाच्या शिकवणीतून व मार्गदर्शनातून विश्व हिंदू परिषदेच्या कठोर तपस्येतून श्रीरामाच्या मंदिर निर्माणाचे रूप ४ वर्षानंतर प्रत्यक्ष साकार होणार आहे. आयोध्येतील या श्रीराम मंदिराच्या बांधणीत देशातील, जगभरातील श्रीराम भक्तांचा सहभाग असावा यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून रामभक्तांसाठी देशातील ४ लाख  गावांत जाऊन जागरण अभियान घेऊन तसेच श्रीराम मंदिर उभारणी साठी यथाशक्ती योगदान देण्यासाठी निधीसंकलन  करण्यात येणार आहे. याकरिता गाव, वाड्या, वस्त्यांमध्ये जाऊन बैठका घेऊन त्याची रचना करण्यात येणार आहे. देशपातळीवर करण्यात येणाऱ्या या मंदिर निर्माणाच्या नियोजनासाठी माणगांव प्रखंडात विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय संघटन मंत्री श्री. श्रीरंगजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण रायगड अभियान प्रमुख श्री. नितीन बामगुडे व सहअभियान प्रमुख श्री. काशिनाथ गाणेकर यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले. यावेळी रायगड जिल्हा संघटनमंत्री श्री. राहूल तळकर, माणगांव प्रखंडमंत्री महेश मोरे, अॅड .अनिकेत ठाकूर, श्री. शरद गांगल, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख राजन पाटील यांच्यासह तळा व माणगाव प्रखंडातून अनेक श्रीराम भक्त उपस्थित होते. या बैठकीत येत्या २० डिसेंबरला व्यापक बैठक घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Popular posts from this blog