रायगड विकास प्राधिकरणाचे काम परवानगीविना कूर्मगतीने, खुद्द अध्यक्षांची कबुली! 

शासकीय बिलाबाबत शिवप्रेमींमध्ये साशंकता 

विकसनाचे गणित चुकले? 

माणगांव (राजन पाटील) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाचा विकास व्हावा याकरिता तत्कालीन राज्य सरकारने रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली. या विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद खासदार संभाजी राजेंकडे देण्यात आले पण विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडाचा विकास कामासाठी लागणारी परवानगी प्राधिकरणाने न घेताच काम सुरु केले आणि या कामासाठी आणखी किती कालावधी जाईल याबद्दलचे गणित प्राधिकरणाच्या अध्यक्षांचे चुकले असल्याचीच जणू काही प्रतिक्रिया दिल्याचे स्पष्ट केले आहे. 

१९ डिसेंबरच्या कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दस्तुरखुद्द अध्यक्षांनीच या कामासाठी लागणारी पुरातत्व व अन्य खात्याची पूर्व परवानगी घेतली नसल्याची कबूली दिली आहे. ही परवानगी आपण एकाच छताखाली घेतली जाईल असे मत व्यक्त केले. तसेच या तीन वर्षांत केवळ ५% च काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामे आगामी ८ वर्षांत पूर्ण होतील अशीही माहिती खासदार संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. म्हणजे तीन वर्षांत केवळ ५% काम झाले आहे मग त्यासाठी लागणारा शासनाकडील निधी ५% च खर्ची पडला आहे का? तीन वर्षांत केवळ ५% काम मग उर्वरित ९५% काम पुढील आठ वर्षांत होणं कस शक्य आहे? मग हे गणित कुठले? हे गणित चूक कि बरोबर हे स्वतः अध्यक्षानीच ठरवावे असे शिवप्रेमींचे मत आहे. महाड येथील पत्रकार परिषदेत रायगड विकास प्राधिकरणाचे काम प्रगतीपथावर अशी कबूली दिलेल्या अध्यक्षांची बोलताना काही तरी गडबड होत आहे. 

या प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसन होत असताना इथल्या स्थानिकांना कामाचा ठेका न देणे, तो विशिष्ठ लोकांनाच देणे, ओझी वाहण्यासाठी प्राण्यांच्या वापर करण्यासाठी पूर्व परवानगी न घेता वापर करणे, बांधकामासाठी वापरलेला चूना व तत्सम साहित्याचा दर्जाचा प्रयोगशाळेतील अहवाल न घेताच काम सुरू करणे इथल्या अद्ययावत असलेल्या रोप -वे संदर्भात साशंकता निर्माण करणे, इथल्या स्थानिकांना रोजगार न मिळणे अशा एक ना अनेक समस्याच या प्राधिकरणाच्या माध्यमातून निर्माण झाल्या आहेत. 

अर्थात, अनेक वेळेस या प्राधिकरणाच्या बांधकामासाठी अनेक वेळा शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्या हत्ती तलावाची डागडूजी करुन गाळ काढणे, गळती रोखणे या संदर्भातील प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याविषयी येथील जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत काशिनाथ ठाकूर व शिवप्रेमींनी आंदोलन केले होते. त्या अभूतपूर्व आंदोलनाला इथल्या शिवप्रेमींनी दिलेले सहकार्य व किल्ले परिसरातील नाराज असलेल्या १२ वाडयांवरील विरोध यामुळे रायगड विकास प्राधिकरणाच्या बाबतीत लोक तीव्र नाराज आहे. 

तरीही विकास प्राधिकरण रायगड विकसनाच्या नावाखाली बरच काही लपवतय कि काय असे जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड.अनिकेत काशिनाथ ठाकूर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 

इथल्या शिवप्रेमींनी व जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अनिकेत ठाकूर यांनी एकत्र येऊन या विकास प्राधिकरणाच्या कामाबाबत केंद्र सरकार दरबारी केलेल्या  चौकशी केल्याची धग लागल्यानेच खासदार संभाजी राजे यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत कामाच्या परवानगी बाबत असे विधान केल्याचे जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अनिकेत काशिनाथ ठाकूर यांनी सांगितले.

Popular posts from this blog