राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अशोक जाधव धनगांवकर यांची निवड करण्याची कोकण विभागाची मागणी


रायगड (जानवी मेस्त्री) : देश स्वतंत्र झाल्यापासून भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये गणल्या जाणाऱ्या गोपाळ समाजातील एकाही व्यक्तीला आमदारकीपर्यंत पोहचता आले नाही. विविध विमुक्त जाती भटक्या जमाती, ओबीसी, एसबीसी, आदिवासी, दलित, बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी गोपाळ समाजाचे नेते तथा भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष अशोक जाधव धनगांवकर यांची २०२० मध्ये राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त आदिवासी ओबीसी समाजाच्या वतीने शरदचंद्र पवार यांच्याकडे होत आहे.

अशोक जाधव धनगांवकर हे बऱ्याच वर्षांपासून गोर गरीब समाजासाठी तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे. त्यांनी भटक्या विमुक्त समाजाचे नेते स्व. आसाराम गुरजी जाधव, स्व. मोतिराज राठोड-औरंगाबाद, माणिकराव लोणारे-येवला, जी. जी. चव्हाण-नाशिक, रमेश श्रींखडे-धुळे, साहित्यिक लक्ष्मण गायकवाड, भाऊ कोरडे, डॉ. कैलाश गोंड-मुंबई, माजी आमदार लक्षण माने-सातारा, व्यंकटराव अवधूत-पुणे, रेणके आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके, मच्छिंद्र भोसले-सोलापूर, सुधिर अनवले, राजेंद्र वनारसे-लातुर, शिवाजीराव शेलार, अर्जुन गोत्राळ-अहमदनगर यांच्या सोबत चळवळीत काम केलेले आहे.

चळवळीत काम करत असताना अहमदनगर जिल्ह्यातील भटक्या विमुक्त समाजाचा मेळावा, नाशिक येथील मेळावा, चाळीसगाव येथील बिऱ्हाड मोर्चा, मुंबई येथील हायकोर्टावरचा मोर्चा, नागपूर येथील झोळीदान मोर्चा, औरंगाबाद जिल्ह्यातील सिमा राठोड प्रकरणावरील मोर्चा, तसेच बऱ्याच मोर्चा त हिरारीने भाग घेतला आहे. तसेच संघटनेच्या माध्यमातून पुणे येथील शनिवार वाड्यावरचा मेळावा, नांदेड येथील मोढा मैदानावर मेळावा, नागपूर येथील कस्तुरचंद पार्कवर मेळावा, उंटखाना मैदानावर आदिवासी मैळावा, औरंगाबाद येथील आमखास मैदानावर मेळावा, मुंबई येथील आझाद मैदानावर, मेळावा, नेरळ येथील मुस्लिम समाजाचा मेळावा असेल असे किती तरी मेळाव्यात समाजप्रबोधनाचे काम करुन समाज एकत्रित करून समाजाच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव म्हणूनदेखील काम केले आहे व पक्षाच्या माध्यमातून त्यांनी भटक्या विमुक्त जाती जमाती, ओबीसी, एसबीसी, आदिवासी, दलित, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले आहे. ते समाजाच्या चळवळीत १९८८ पासून तळमळीने काम करत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या ई-मेल आयडीवर महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती जमातीतील लोकांकडून निवेदने पाठवून अशोक जाधव धनगांवकर यांना विधानपरिषदेचे आमदार म्हणून नियुक्त करण्यासाठी राज्यपाल साहेबांच्या कडे राज्यमंत्री मडंळाच्या माध्यमातून शिफारस करावी अशी मागणी जोर धरताना दिसत आहे.

स्वातंत्र्याची ७३ वर्षे उलटून गेली तरीही आजपर्यंत भटक्या विमुक्त समाजाची परवड होतच असुन भटक्या विमुक्त साठीचे अनेक आयोग नेमले गेले व त्यांच्या शिफारशी देखील केंद्र सरकार कडे त्या त्या आयोगाने पाठवल्या आहे परंतु त्यावर अजून कोणत्याही सरकारने निर्णय घेतला नाही. म्हणून चळवळीत सक्रिय काम करणाऱ्या चळवळीचे नेते अशोक जाधव धनगांवकर यांना आमदार करून नियुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याच्या सर्व संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला कार्याध्यक्षा जानवी पी. मेस्त्री, महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख गोरख गव्हाणे, शासकीय निमशासकीय कर्मचारी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप गोपाळ, चित्रपट अभिनेते टिव्ही कलाकार कर्मचारी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत जगताप, कोकण विभागाचे प्रमुख प्रकाश चव्हाण, गोपाळ समाजाचे कोकण विभागाचे नेते गंगाराम चव्हाण, कोकण विभागाचे कार्याध्यक्ष संजय पेंडर, तिरमल समाजाचे अध्यक्ष राम भिंगारे,गोपाळ समाजाचे नेते बन्सी बापू गव्हाणे, अरुण काते रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष, गोविंद राठोड रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष ,पालघर महिला जिल्हा अध्यक्ष पुष्पा गोसावी, जिल्हा कार्याध्यक्ष मंगल कडू भगत, भामटी समाजाचे नेते दिलीप मते आदि सह भटक्या विमुक्त जाती जमाती, ओबीसी, एसबीसी, आदिवासी, दलित, बहुजन समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. 

Popular posts from this blog