कोरोनाबाधीत मृतदेहाचा अंत्यविधी माणगांव स्मशानभूमीत, माणगावकरांचे जीवनमान धोक्यात 


माणगांव (उत्तम तांबे) : कोरोना संसर्गजन्य रोगाची साथ संपूर्ण देशात पसरलेली असतानाच माणगांव शहर त्यापासून वंचित राहिलेले नाही. या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने आरोग्य यंत्रणेमार्फत केलेल्या आवाहनाचे, नियमांचे लोक सद्या पालन करीत आहेत असे म्हणता येणार नाही. कारण त्यामुळेच कोरोना बाधितांच्या संखेत वाढ होताना दिसत आहे. माणगांव तालुक्यात जवळपास ७१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर माणगांव उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू असताना या रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला.

सदर मृत्यू झालेल्या रूग्णाचे माणगांवमधील काळनदीच्या किनारी असलेल्या स्मशानभूमीत दहन करण्यात आले. दरम्यान, हा मृतदेह पूर्णपणे न जळल्याने याची दुर्गंधी नजीक असलेल्या खांदाड गावात पसरल्याने तेथील ग्रामस्थांनी पाहणी केल्यानंतर सदर मृतदेह अर्धवट जळल्याचे निदर्शनास आले. सदर घटनेबाबत खांदाड ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत खांदाड ग्रामस्यांनी नगरपंचायत कार्यालयात तक्रार केल्यानंतर सदर मृतदेह पूर्णपणे दहन करण्यात आला. परंतु अद्यापपर्यंत त्याची राख दफन करण्यात आली नाही. सदर दहन केलेल्या रूग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याची माहिती नगरपंचायत कार्यालयाकडून समजली आहे.           

माणगावची काळनदी ही माणगांवकरांसाठी जीवनवाहिनी आहे. या काळनदिकिनारी स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमितील मृतदेहाची राख या काळनदीत सोडली जाते. सद्या पावसाचे दिवस असल्याने अनेक मृतदेहांच्या राखेची पावसाने धूप होऊन ती नादिमध्ये विसार्जित होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगांव उपजिल्हा रुग्णालयात मृत झालेल्या रुग्णाचे या स्मशानभूमीत दहन करणे माणगांवकर नागरिकांसाठी धोकादायक आहे. अशा मृतदेहाची अंत्यविधी, विल्हेवाट निर्जन ठिकाणी असलेल्या स्मशानभूमित करावी अशी खांदाड ग्रामस्थांची मागणी आहे. या घटनेबाबत दक्षता घेण्यासाठी खांदाड ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून चेतन गायकवाड (ओमकार भजनी मंडळाचे माजी अध्यक्ष) यांनी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, माणगांव नगरपंचायत कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. 

Popular posts from this blog