माणगांव तालुक्यात भामटा 'बेवडा पत्रकार' सोशल मिडीयावरून पसरवतोय खोट्या बातम्या 



माणगांव (प्रतिनिधी) :
पत्रकार कसा असावा? त्याच्या कल्पनांची भरारी ही क्षितीजाला भिडणारी, तर शब्दांची गरूडझेप ही दुष्प्रवृत्तींवर झडप घालणारी असावी. साळींदराचे काटे हे जसे त्याच्या संरक्षणाचे अस्त्र असते, त्याचप्रमाणे पत्रकाराची निर्भयता हेच त्याचे शस्त्र असते.! अशा विविध वाक्यांनी निर्भिड व निष्पक्ष पत्रकारांबाबत बोलले जाते. आजच्या परिस्थितीत पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते. परंतु काही विकाऊ पत्रकारांनी तुटपुंज्या पैशांच्या हव्यासापोटी पत्रकारितेचा बाजार मांडल्याचे दिसत आहे. ज्यांचा मिडीयाशी काहीच संबंध नाही असे 'नवशिके' व स्वयंघोषित तज्ज्ञ पत्रकार आजदेखील यूट्यूबवर (सोशल मिडीयावर) खोट्या बातम्या प्रसारित करून स्वतः एक मोठा पत्रकार असल्याचा दिखावा करू लागले आहेत.

माणगांव तालुक्यात तर अशाच एका भामट्या व बेवड्या ज्येष्ठ पत्रकाराने तर यूट्यूब चॅनलवर अर्थात सोशल मिडीयावर दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. एखादा उत्साही 'नवशिक्या पत्रकार' कोणतीही बिनबुडाची अथवा दिशाभूल करणारी खोटी बातमी एखाद्या युट्यूब चॅनलवर पाठवतो व बिचारा नॉलेज नसलेला संपादक त्याच्या बातम्या आहेत तशाच प्रसारित करत असतो. सोशल मिडीयावर सत्य बातमी प्रसारित करणे हे चुकीचे नाही, परंतु खोट्या व बदनामीकारक बातम्यांमुळे 'सोशल मिडीया अॅक्ट' नुसार कारवाई होऊ शकते हे त्या बिचाऱ्या संपादकालाही माहिती नसते. अशा वेळी मात्र अज्ञानी संपादक हा निष्कारण 'बळीचा बकरा' बनत असतो. अशाच प्रकारे एका भामट्या पत्रकाराने तर माणगांव तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. ५०० रूपयांत विकल्या जाणाऱ्या या नवशिक्या बेवड्या ज्येष्ठ पत्रकाराने तर खोट्या बातम्या प्रसारित करून वितंडवाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या भामट्या पत्रकाराने कंपनीच्या मॅनेजरना कॉल करून धमकावणे, रेशन दुकानदारांना दमदाटी करणे, सर्वसामांन्यांना ब्लॅकमेल करणे, चॅनलची धमकी दाखवून पैसे उकळणे, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर शायनिंग दाखविणे असे उद्योग सुरू ठेवलेले आहेत. परिणामी अशा प्रकारच्या भामट्या पत्रकारांपासून नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे व यूट्यूब चॅनलवर कोणाचीही बदनामी होत असल्यास संबंधित नागरिकांनी सायबर क्राईम सेल कडे तक्रार दाखल करावी. तसेच कुणालाही दमदाटी करून पैसे मागण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर खंडणी बाबतची तक्रार दाखल करणे गरजेचे आहे.

यापूर्वी 'पत्रकार' हा शब्द ऐकला तर त्याकडे आदराने पाहिले जात होते. परंतु सध्या तर काही बेवड्या 'विकाऊ' पत्रकारांमुळे तर पत्रकारिता क्षेत्र बदनाम होत चालल्याचे दिसत आहे.

Popular posts from this blog