आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मागणीला यश 


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले ७० टन धान्य आणि महिना भर पुरेल असे जीवनावश्यक साहित्य.! आमदार भरतशेठ गोगावले, पालकमंत्री तटकरे यांच्या उपस्थितीत वाटप

परिस्थिती पाहून गरजवतांनाच धान्य वाटप होणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच दक्षिण रायगड विभाग आहे - पालकमंत्री अदिती तटकरे



माणगांव (प्रतिनिधी) :
महाड, माणगाव, पोलादपूर तालुक्यातील बाहेरगावी कामानिमित्त असलेले चाकरमानी ग्रामस्थ या उद्भवलेल्या कोरोना विषाणूमुळे आपआपल्या गावी परतले असल्याने त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल झाले होते. या सर्वांची गोगावले यांनी दखल घेऊन शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे धान्य देण्याची मागणी केली होती.


गोगावले यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन महाडसाठी २५ टन, माणगाव २५ टन, पोलादपूर २० टन असे गहू, आणि तांदूळ, मिळून ७० टन धान्य आणि त्यासोबत एक महिनाभर पुरेल असे कडधान्य, डाळी, तेल आणि इतर जीवनावश्यक साहित्य पाठवून दिले आहे.
त्या वाटपाचा शुभारंभ सकाळी महाड प्रांत कार्यालयात विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच माणगाव तहसील कार्यालयात देखील आमदार भरतशेठ गोगावले आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत धान्य वाटप करण्यात आले.

याप्रसंगी महाड प्रांत अधिकारी विठल इनामदार, माणगांव प्रांत अधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार पवार, कांबळे तलाठी, ग्रामसेवक आणि इतर अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या मदतीमुळे गोगावले यांचे सर्व स्तरांतून आभार व्यक्त होत आहेत.

सदर धान्य हे ग्रामसेवक, तलाठी यांनी केलेल्या सर्वे नुसार वाटप होणार असल्याने त्यांचाच ताब्यात हे धान्य आणि साहित्य देण्यात आले आहे.

Popular posts from this blog